माव्र्हल एम्पायर सोसायटीतील गैरव्यवहारामुळे अनेक नागरिक फसले; शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीत गट नं. ३०९/१ मधील तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीचा एन.ए. प्लॉट विक्री आणि बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश जारी केला आहे. या जमिनीवर सध्या न्यायालयीन दावा सुरु असताना देखील ५० पेक्षा जास्त प्लॉट्स विकण्यात आले असून, विक्री आणि बांधकाम अजूनही सुरु होते.
या गटाला नियमबाह्य पद्धतीने बिनशेती परवानगी मिळाल्याचा आरोप परशुराम पाचर्णे यांनी केला असून, त्यांनी दाखल केलेल्या अपिलावर प्रांताधिकाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणात ले-आऊट मंजुरीदरम्यान नियमानुसार आयताकृती अथवा चौकोनी आकारात ओपन स्पेस ठेवणे बंधनकारक असताना त्रिकोणी आकारात ओपन स्पेस दाखवण्यात आला. तसेच १५% अमिनिटी स्पेसची अट धाब्यावर बसवत केवळ ५% जागा दाखवण्यात आली. एवढ्यावरच न थांबता नगरपरिषद अभियंता व मुख्याधिकारी यांनी चुकीच्या नकाशाला मंजुरी दिली.
चुकीच्या ले-आऊटनुसार तहसिलदारांनी बिनशेती आदेश दिला आणि भूअभिलेख विभागाने त्या आधारे पोटहिस्से करून ७/१२ मध्ये नोंदी घेतल्या. यामुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकारामुळे अनेक नागरिक फसले असून त्यांनी प्लॉट खरेदी करताना एन.ए. ऑर्डर आणि ले-आऊटची प्रत मिळवलेली नव्हती. प्रांताधिकाऱ्यांनी तहसिलदार व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना सर्व कागदपत्रांची पडताळणी करून लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणात अनेक शासकीय बडे अधिकारी अडकण्याची शक्यता असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांना न्याय मिळण्याच्या आशा पुन्हा जागवल्या जात आहेत.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…