मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात ऐन यात्रेच्या दिवशी युवकाने पेटविला स्वतःचा बंगला व कार

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती येथील एका युवकाने ऐन यात्रेच्या दिवशी (दि. 24) रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःची कार व बंगला पेटवून देऊन गावामध्ये तमाशा पाहण्यासाठी गेल्याची घटना घडली. मात्र शिक्रापूर पोलीस व नागरिकांनी तातडीने आग विझवीत बंगाल्यात कार पेटवणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे या युवकाचे आई वडील वाजेवाडी मध्ये गेलेले असताना प्रज्योत याने बंगल्याच्या बाजूला असलेली एम एच १२ ए जि ९४१८ हि कार पेटवून देत बंगल्यामध्ये जाऊन बंगल्यात देखील आग लागली. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस हवालदार भरत कोळी, उद्धव भालेराव, वाजेवाडीच्या पोलीस पाटील सोनाली वाजे, कचरुनाना वाजे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली.

दरम्यान कारचे मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने चारही टायर तसेच एच पी च्या सिलेंडरने स्फोट घेतला, तर आग लावणारा युवक फरार झाला, यावेळी प्रकाश गायकवाड, कचरुनाना वाजे, वैभव दरेकर, प्रकाश वाजे, रवी वाजे, गजानन गायकवाड, काळूराम बोत्रे, संदीप जगताप यांसह आदींनी शेजारील पाण्याची मोटार चालू करुन आग विझवली.

मात्र तोपर्यंत संपूर्ण कार, बंगल्यातील सर्व धान्य, कपडे यांसह काही चीज वस्तू जळून खाक झाल्या. दरम्यान जाळपोळ करणारा प्रज्योत तांबे गावामध्ये यात्रेत सुरु असलेला तमाशा पाहत बसल्याचे पोलिसांना समजताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस शिपाई उद्धव भालेराव यांनी सदर ठिकाणी जात प्रज्योत याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही पोलीस करत आहे.

यात्रेच्या दिवशीच घडलेल्या प्रकाराने हळहळ…

पिंपळे जगताप गावची काळ पासून यात्रा सुरु यात्रेमुळे पाहुणे घरी येत असतात मात्र ऐन यात्रेच्या दिवशीच गावामध्ये सदर युवकाने स्वतःचा बंगला आणि कार पेटवून दिल्याची घटना घडल्याने परिसरात नागरिक व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

9 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

9 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

9 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

9 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

14 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

14 तास ago