शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती येथील एका युवकाने ऐन यात्रेच्या दिवशी (दि. 24) रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःची कार व बंगला पेटवून देऊन गावामध्ये तमाशा पाहण्यासाठी गेल्याची घटना घडली. मात्र शिक्रापूर पोलीस व नागरिकांनी तातडीने आग विझवीत बंगाल्यात कार पेटवणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे या युवकाचे आई वडील वाजेवाडी मध्ये गेलेले असताना प्रज्योत याने बंगल्याच्या बाजूला असलेली एम एच १२ ए जि ९४१८ हि कार पेटवून देत बंगल्यामध्ये जाऊन बंगल्यात देखील आग लागली. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस हवालदार भरत कोळी, उद्धव भालेराव, वाजेवाडीच्या पोलीस पाटील सोनाली वाजे, कचरुनाना वाजे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली.
दरम्यान कारचे मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने चारही टायर तसेच एच पी च्या सिलेंडरने स्फोट घेतला, तर आग लावणारा युवक फरार झाला, यावेळी प्रकाश गायकवाड, कचरुनाना वाजे, वैभव दरेकर, प्रकाश वाजे, रवी वाजे, गजानन गायकवाड, काळूराम बोत्रे, संदीप जगताप यांसह आदींनी शेजारील पाण्याची मोटार चालू करुन आग विझवली.
मात्र तोपर्यंत संपूर्ण कार, बंगल्यातील सर्व धान्य, कपडे यांसह काही चीज वस्तू जळून खाक झाल्या. दरम्यान जाळपोळ करणारा प्रज्योत तांबे गावामध्ये यात्रेत सुरु असलेला तमाशा पाहत बसल्याचे पोलिसांना समजताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस शिपाई उद्धव भालेराव यांनी सदर ठिकाणी जात प्रज्योत याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही पोलीस करत आहे.
यात्रेच्या दिवशीच घडलेल्या प्रकाराने हळहळ…
पिंपळे जगताप गावची काळ पासून यात्रा सुरु यात्रेमुळे पाहुणे घरी येत असतात मात्र ऐन यात्रेच्या दिवशीच गावामध्ये सदर युवकाने स्वतःचा बंगला आणि कार पेटवून दिल्याची घटना घडल्याने परिसरात नागरिक व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे.
लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हर अन्न पचवण्यासोबतच पचनासाठी…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…