शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील एका गुऱ्हाळात बेकायदेशीररीत्या बंदिस्त ठेवण्यात आलेल्या १४ मजुरांची अखेर सुटका करण्यात महसुलव पोलीस प्रशासनाला मोठे यश आले आहे. गेली दोन ते तीन वर्षे अत्यंत हालअपेष्टांत अडकून पडलेल्या या मजुरांना गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात प्रशासन आणि लेबर लाईन सामाजिक संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले.
ज्ञानेश्वर साहेबराव चव्हाण (रा. म्हगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी लेबर लाईन पोर्टलवर तक्रार दाखल करत सांगितले की, आलेगाव पागा येथील एका शेतगुऱ्हाळात ते आणि इतर १३ मजूर जबरदस्तीने मजुरीसाठी अडकवले गेले असून मालकाकडून मानसिक, आर्थिक आणि सामाजिक छळ होत आहे.
या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, कामगार निरीक्षक संपत गुंजाळ आणि लेबर लाईन संस्था – अजिविका ब्युरो, हडपसर पुणे यांचे संयुक्त पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व १३ मजुरांची सुखरूप सुटका केली.
सुटकेनंतर सर्व कामगारांना शिरूर तहसील कार्यालयात आणून अधिकृत सुटका प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय, त्यांना तातडीने जेवण देण्यात आले आणि त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची संपूर्ण व्यवस्था प्रशासनाने केली.
याप्रसंगी प्रांताधिकारी पूनम अहिरे,तहसीलदार बाळासाहेब म्हस्के,नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, कामगार निरीक्षक संपत गुंजाळ तसेच लेबर लाईन संस्थेचे शुभम गुरव, पराग कांबळे, अर्चना यादव हे सर्व उपस्थित होते. तक्रारदार चव्हाण यांनी संबंधित शेतमालकावर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.या धडक आणि प्रभावी कारवाईमुळे गुलामगिरीसारख्या अमानवीय परिस्थितीत अडकलेल्या कुटुंबांना नवा श्वास मिळाला आहे. जिल्हाधिकारी डुडी यांनी घेतलेल्या तातडीच्या निर्णयाबद्दल आणि संपूर्ण प्रशासकीय पथकाच्या सक्रिय सहभागाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…