मुख्य बातम्या

मनसे शिरूरच्या वतीने विसर्जन घाटावर महाप्रसादाचे वाटप;  हजारो गणेशभक्तांनी घेतला लाभ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील शनी मंदिर विसर्जन घाटावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूरच्या वतीने गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा सकाळी ८ वाजल्यापासून शुभारंभ झाला. तब्बल ५,००० हून अधिक गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

या सतत पाचव्या वर्षी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे गणेशभक्तांमध्ये समाधानाची भावना होती. मनसे कार्यकर्त्यांच्या या सेवाभावाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

या उपक्रमा मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सामाजिक भान आणि जनतेशी असलेली नाळ दृढ करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमाबाबत माहिती देतानामनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब सय्यद , शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे ,’आम्ही शिरूरकर फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बापू सानप, मनसे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे ,शहराध्यक्ष आदित्य मैडआणि शहर सचिव रवी लेंडे यांनी संयुक्तपणे सांगितले की, “गणेश भक्तांच्या सेवेसाठी आम्ही दरवर्षी हा उपक्रम श्रद्धेने व निस्वार्थपणे राबवत आलो आहोत. भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच आमचं यश आहे.”

विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक शिरूरमधील शिनी मंदिर विसर्जन घाटावर एकत्र येतात. त्यामुळे मनसेच्या या उपक्रमामुळे अनेकांना सकस व गरमागरम प्रसादाची सोय झाली.महाप्रसादाच्या वाटपासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. स्वच्छता, शिस्त व आत्मीयता यामुळे या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

या उपक्रमाचे यंदाचे ५वे यशस्वी वर्ष होते.सकाळी ८ वाजता महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली.५,००० पेक्षा अधिक भक्तांनी घेतला प्रसादाचा लाभ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम,विसर्जन घाटावर गणेश भक्तांची विशेष गर्दी, शिस्तबद्ध व स्वच्छ नियोजनाने उपक्रम ठरला यशस्वी हे असेच उपक्रम भाविकांच्या सेवेसाठी दरवर्षी व्हावे, अशीच अपेक्षा शिरूरकरांनी व्यक्त केली.मनसेच्या या सामाजिक कार्यामुळे संघटनेचे स्थान स्थानिक पातळीवर अधिक मजबूत होत आहे, असे जाणकारांनी म्हटले आहे.

महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून विसर्जन घाटावर मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती. सर्व वयोगटातील लोकांनी शांततेत, रांगेत महाप्रसाद घेतला. भाविकांनी “ही परंपरा अबाधित ठेवावी, मनसेचे मनापासून आभार” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील वर्षीही अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबविला जावा, अशी भावना शिरूरकरांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

32 मिनिटे ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

12 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

12 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

12 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

12 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

12 तास ago