मुख्य बातम्या

मनसे शिरूरच्या वतीने विसर्जन घाटावर महाप्रसादाचे वाटप;  हजारो गणेशभक्तांनी घेतला लाभ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील शनी मंदिर विसर्जन घाटावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूरच्या वतीने गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा सकाळी ८ वाजल्यापासून शुभारंभ झाला. तब्बल ५,००० हून अधिक गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

या सतत पाचव्या वर्षी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे गणेशभक्तांमध्ये समाधानाची भावना होती. मनसे कार्यकर्त्यांच्या या सेवाभावाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

या उपक्रमा मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सामाजिक भान आणि जनतेशी असलेली नाळ दृढ करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमाबाबत माहिती देतानामनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब सय्यद , शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे ,’आम्ही शिरूरकर फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बापू सानप, मनसे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे ,शहराध्यक्ष आदित्य मैडआणि शहर सचिव रवी लेंडे यांनी संयुक्तपणे सांगितले की, “गणेश भक्तांच्या सेवेसाठी आम्ही दरवर्षी हा उपक्रम श्रद्धेने व निस्वार्थपणे राबवत आलो आहोत. भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच आमचं यश आहे.”

विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक शिरूरमधील शिनी मंदिर विसर्जन घाटावर एकत्र येतात. त्यामुळे मनसेच्या या उपक्रमामुळे अनेकांना सकस व गरमागरम प्रसादाची सोय झाली.महाप्रसादाच्या वाटपासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. स्वच्छता, शिस्त व आत्मीयता यामुळे या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

या उपक्रमाचे यंदाचे ५वे यशस्वी वर्ष होते.सकाळी ८ वाजता महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली.५,००० पेक्षा अधिक भक्तांनी घेतला प्रसादाचा लाभ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम,विसर्जन घाटावर गणेश भक्तांची विशेष गर्दी, शिस्तबद्ध व स्वच्छ नियोजनाने उपक्रम ठरला यशस्वी हे असेच उपक्रम भाविकांच्या सेवेसाठी दरवर्षी व्हावे, अशीच अपेक्षा शिरूरकरांनी व्यक्त केली.मनसेच्या या सामाजिक कार्यामुळे संघटनेचे स्थान स्थानिक पातळीवर अधिक मजबूत होत आहे, असे जाणकारांनी म्हटले आहे.

महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून विसर्जन घाटावर मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती. सर्व वयोगटातील लोकांनी शांततेत, रांगेत महाप्रसाद घेतला. भाविकांनी “ही परंपरा अबाधित ठेवावी, मनसेचे मनापासून आभार” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील वर्षीही अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबविला जावा, अशी भावना शिरूरकरांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

2 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

2 दिवस ago