शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिसांनी आंतरराज्यीय सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल ९ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ३.१५ किलो तांब्याच्या कॉईलसह एकुण ५लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
घटना कशी उघडकीस आली…?
दि ४ जुलै २०२५ रोजी रात्री आंबळे (ता. शिरुर) येथील गट नं. ५७९ मधून १००/२२ के.व्ही. ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) मधील सुमारे ५० किलो तांबे असलेली कॉईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय विद्युत कायदा कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तपासाची दिशा आणि पोलिसांचा सापळा…
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या टोळीचा शोध घेतला गेला. गुप्त माहितीच्या आधारे चिखली, पुणे येथे सापळा रचून मारुती सुझुकी एसएक्स ४ (एम एच ०१ए एच ३९१२) या वाहनासह तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
यातील तीन आरोपी १) लवकुश कुमार गौतम (वय २२) मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, २) मोहम्मद फरान खान (वय २१) मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, ३) मुजाहिर सौकत अली खान (वय २२) मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश (सर्व सध्या रा. कुदळवाडी, चिखली, पुणे) या आरोपींनी राहुल गुप्ता व लवकुश मिश्रा (पूर्ण पत्ता अज्ञात) यांच्यासह मिळून एकूण ९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात ३१५ किलो तांबे (कॉईल) अंदाजे किंमत २ लाख ५० हजार, चोरीत वापरलेली एसएक्स ४ कार, अंदाजे किंमत ३ लाख असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, अरुण उबाळे, शरद वारे, विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांनी केली आहे.
शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड
शिक्रापूर पोलिसांनी चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन चोरांना रंगेहाथ पकडले
शिरुर तालुक्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडले; चार जणांना अटक
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…