मुख्य बातम्या

शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले ३५ मोबाईल परराज्यातून आणि परजिल्ह्यातून शोधून मूळ मालकांच्या ताब्यात

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३५ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. ही सर्व मोबाईल्स परराज्य व परजिल्ह्यांमधून शोधून काढण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ६ लाख ८६ हजार रुपये इतकी आहे.

सन २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान शिरूर शहरातील बाजारपेठ, बस स्थानक आणि इतर परिसरातून मोबाईल हरवलेबाबत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मा. श्री. संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला मोबाईल शोधण्याचे आदेश दिले.त्यानुसार, पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी सुसज्ज तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत हरवलेले मोबाईल ट्रॅक करण्याचे काम सुरू केले. या परिश्रमातून तब्बल ३५ मोबाईल्स यशस्वीरीत्या शोधण्यात आले.

दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या हस्ते हे मोबाईल फोन मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. अनेक नागरिकांनी गहाळ मोबाईल परत मिळणार नाही असे मानले होते, मात्र पुन्हा आपला मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आणि मनापासून आभार व्यक्त केले.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अमंलदार विजय शिंदे यांचा मोलाचा सहभाग होता.शिरूर पोलिसांची ही कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारी ठरली असून, पोलिसांबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक बळकट करणारी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

12 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

17 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

17 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

17 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

17 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

19 तास ago