मुख्य बातम्या

शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले ३५ मोबाईल परराज्यातून आणि परजिल्ह्यातून शोधून मूळ मालकांच्या ताब्यात

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३५ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. ही सर्व मोबाईल्स परराज्य व परजिल्ह्यांमधून शोधून काढण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ६ लाख ८६ हजार रुपये इतकी आहे.

सन २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान शिरूर शहरातील बाजारपेठ, बस स्थानक आणि इतर परिसरातून मोबाईल हरवलेबाबत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मा. श्री. संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला मोबाईल शोधण्याचे आदेश दिले.त्यानुसार, पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी सुसज्ज तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत हरवलेले मोबाईल ट्रॅक करण्याचे काम सुरू केले. या परिश्रमातून तब्बल ३५ मोबाईल्स यशस्वीरीत्या शोधण्यात आले.

दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या हस्ते हे मोबाईल फोन मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. अनेक नागरिकांनी गहाळ मोबाईल परत मिळणार नाही असे मानले होते, मात्र पुन्हा आपला मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आणि मनापासून आभार व्यक्त केले.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अमंलदार विजय शिंदे यांचा मोलाचा सहभाग होता.शिरूर पोलिसांची ही कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारी ठरली असून, पोलिसांबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक बळकट करणारी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

7 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

7 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

7 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

7 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

7 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

7 तास ago