मुख्य बातम्या

शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले ३५ मोबाईल परराज्यातून आणि परजिल्ह्यातून शोधून मूळ मालकांच्या ताब्यात

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३५ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. ही सर्व मोबाईल्स परराज्य व परजिल्ह्यांमधून शोधून काढण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ६ लाख ८६ हजार रुपये इतकी आहे.

सन २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान शिरूर शहरातील बाजारपेठ, बस स्थानक आणि इतर परिसरातून मोबाईल हरवलेबाबत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मा. श्री. संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला मोबाईल शोधण्याचे आदेश दिले.त्यानुसार, पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी सुसज्ज तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत हरवलेले मोबाईल ट्रॅक करण्याचे काम सुरू केले. या परिश्रमातून तब्बल ३५ मोबाईल्स यशस्वीरीत्या शोधण्यात आले.

दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या हस्ते हे मोबाईल फोन मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. अनेक नागरिकांनी गहाळ मोबाईल परत मिळणार नाही असे मानले होते, मात्र पुन्हा आपला मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आणि मनापासून आभार व्यक्त केले.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अमंलदार विजय शिंदे यांचा मोलाचा सहभाग होता.शिरूर पोलिसांची ही कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारी ठरली असून, पोलिसांबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक बळकट करणारी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

11 तास ago

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…

11 तास ago

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

14 तास ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

17 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

17 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

17 तास ago