शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून एक सात वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रभर बालिकेचा शोध घेतला. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सदर बालिकेचा तिच्या वडिलांनीच खून केल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा युवराज सोळुंके (वय ७) ही चिमुकली मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. शिक्रापूर पोलिसांनी अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, मुलगी मिळाली नव्हती. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास पोलिस करत असताना अनेक ठिकाणी सीसीटिव्ही तपासले. मुलीच्या वडिलांनी मुलीला नदीच्या कडेला नेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यानेच मुलीचा वेळ नदीच्या पाण्यात ढकलून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेळ नदीपात्रात धाव घेतली. घटनास्थळी मुलीच्या चपला मिळून आल्या. मात्र, मुलीचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत मिळून आलेला नाही. शिक्रापूर पोलिसांनी मुलीचे वडील युवराज सोळुंके यास ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…