शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून एक सात वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रभर बालिकेचा शोध घेतला. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सदर बालिकेचा तिच्या वडिलांनीच खून केल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा युवराज सोळुंके (वय ७) ही चिमुकली मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. शिक्रापूर पोलिसांनी अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, मुलगी मिळाली नव्हती. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास पोलिस करत असताना अनेक ठिकाणी सीसीटिव्ही तपासले. मुलीच्या वडिलांनी मुलीला नदीच्या कडेला नेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यानेच मुलीचा वेळ नदीच्या पाण्यात ढकलून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेळ नदीपात्रात धाव घेतली. घटनास्थळी मुलीच्या चपला मिळून आल्या. मात्र, मुलीचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत मिळून आलेला नाही. शिक्रापूर पोलिसांनी मुलीचे वडील युवराज सोळुंके यास ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…