snake
सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या रोहिलवाडीत घोणस सर्प नदीकिनारी शेतालगत चारत असलेल्या दुभत्या जर्शी गायीस चावल्याने काही मिनीटातच त्या गायीचा सापाच्या विषबाधेने दुर्दैवी मृत्यू झाला. सर्प दंशाने मोठी गाय क्षणार्धात दगावल्याने शेतकरी किसन केरू रोहिले यांचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
कवठे येमाईच्या रोहिलवाडीतील शेतकरी किसन केरू रोहिले यांचा मुलगा सागर हा नेहमी प्रमाणे ४ गाया घेऊन नदी किनारी चारण्यासाठी घेऊन गेला होता. शेतीनजीक जनावरे चारीत असताना त्यातील एका दुभत्या गायीने अचानक उडी मारली व सुमारे पन्नास फूट दूर पळत येत जमिनीवर कोसळली. घोणस सारख्या अति विषारी सर्पाचा तोंडास दंश झाल्याने त्या गायीचा काही वेळातच दुर्दैवी मृत्यू झाला. ही गाय दररोज अठरा लिटर दूध देणारी होती. तिचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याने सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी किसान रोहिले यांनी दिली.
“कवठे गावकामगार तलाठी ललिता वाघमारे यांना घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पुढील कार्यवाही साठी हा प्रस्ताव शिरूर तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.”
– माधुरी बागले, मंडल अधिकारी, मलठण.
“मागील दहा दिवसात कवठे येमाई शिवारात विषारी सर्प चावून गाय मृत्युमुखी पडण्याची ही दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे. परिसरात पडत असलेल्या पावसाने मुबलक हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. सर्प दंशाने रोहिलवाडीत आज गायीचा मृत्यू झाल्याची घटना दुःखदायक आहे. शेतकऱयांनी आपली जनावरे नदीकिनारी, शेतानजीक चरावयास नेताना जनावरांची व आपली दक्षता घेणे गरजेचे आहे.’
– विलासराव रोहिले, सामाजिक कार्यकर्ते, कवठे येमाई.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…