शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सुनेचा वेळोवेळी छळ करत माहेरहुन भांडी, पैसे, दागीने तसेच साडयाची मागणी करून त्या वस्तु न मिळाल्याने सुनेला मारहाण करत शिवीगाळ करुन तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पतीसह सासु आणि सासऱ्यांविरुद्ध सुरेखा शहाजी बांदल यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील बोरी गावच्या काव्या हिचा विवाह शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील किशोर संजय निंबाळकर याच्याशी झाला होता. लग्नानंतर सासु लता संजय निंबाळकर, २) सासरे संजय विनायक निंबाळकर व ३) पती किशोर संजय निंबाळकर यांनी काव्याचा वेळोवेळी छळ करत माहेरहुन भांडी, पैसे, दागीने तसेच साडयाची मागणी करून त्या वस्तु न मिळाल्याने सुनेला मारहाण करत शिवीगाळ करत होते.
तसेच सासु लता संजय निंबाळकर हीने काव्या ही गरोदर असताना तीला डॉक्टरांनी बेड रेस्ट करण्याबाबत सांगीतले असताना सासु लता यांनी काव्यास जड उचलण्यास सांगितल्याने तीचा गर्भपात होण्यास सासु लता निंबाळकर ह्या कारणीभूत आहेत. तसेच पती किशोर हा तिला वारंवार मारहाण व शिवीगाळ करत होता. त्यामुळे या सर्वांच्या जाचाला कंटाळून काव्याने (18 जुलै) रोजी दुपारी 2.44 च्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळेमुलगी काव्या हिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने काव्याची आई सुरेखा शहाजी बांदल (वय 42) रा. बोरी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करत आहेत.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…