शिरुर (तेजस फडके): कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील भीमानदीच्या पुलावरील उजव्या बाजूकडील वळणावर पहाटे तीनच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे-नगर महामार्गापासून गाडी साधारणतः पन्नास ते साठ फूट खाली खड्ड्यात वेगाने पलटी झाली. यावेळी एअर बॅग ओपन झाल्याने गाडीतील दोन तरुणांचे प्राण वाचले मात्र अपघातात हे दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असुन त्या तरुणांना ग्रामस्थांनी अक्षरशः काच फोडून बाहेर काढत जीवदान दिले आहे.
कोरेगाव भीमा येथे पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या बाजूने रात्री साडेतीनच्या सुमारास वेगाने एक स्विफ्ट (MH १२ TK ३९७६) वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला वेगात खाली गेली. यावेळी गाडीने पलटी खाल्ली व पन्नास ते साठ फूट गाडी खाली घसरत गेली. यावेळी गाडीच्या पुढील भागातील एअर बॅगा ओपन झाल्या होत्या. पलटी झालेल्या गाडीतील एका तरुणाची मान खिडकीच्या काचेत अडकली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते खंडू चकोर, प्रवीण अशोक कोल्हे व आणखी दोन नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी तरुणांचा जीव वाचवला.
या अपघातात ऋषिकेश यादव (वय ३५) शिरूर,एकनाथ शिंगाल (वय ३३) रा.वाघोली हे जखमी झाले असून शिक्रापूर येथील लंघे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
…अन रुग्णवाहीकेला पाऊणतास उशीर
कोरेगाव भीमा येथील अपघात स्थळी मदतीसाठी गेलेल्या खंडू चकोर यांनी सांगितले की तरुणांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी १०८ नंबरवर कॉल केला होता. त्यावेळी पाऊण तासाने अँब्युलन्स आली याचे कारण अँब्युलन्स वाहकाला विचारले असता गाडीच्या खराब पाठ्यांचे कारण देत यायला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. जर अपघातात जखमी झालेल्यांना वेळेवर मदत मिळणार नसेल व पाऊण तास वाट पाहावी लागणार असेल तर १०८ च्या सेवेविषयी बोलायचं काय ? आणि कोणाच्या भरवश्यावर रुग्णांनी राहायचे असा प्रश्न पडत असून आता १०८ स्वतःची सुविधा वेळेत उपलब्ध करून देणार की रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…