शिरुर (तेजस फडके): कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील भीमानदीच्या पुलावरील उजव्या बाजूकडील वळणावर पहाटे तीनच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे-नगर महामार्गापासून गाडी साधारणतः पन्नास ते साठ फूट खाली खड्ड्यात वेगाने पलटी झाली. यावेळी एअर बॅग ओपन झाल्याने गाडीतील दोन तरुणांचे प्राण वाचले मात्र अपघातात हे दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असुन त्या तरुणांना ग्रामस्थांनी अक्षरशः काच फोडून बाहेर काढत जीवदान दिले आहे.
कोरेगाव भीमा येथे पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या बाजूने रात्री साडेतीनच्या सुमारास वेगाने एक स्विफ्ट (MH १२ TK ३९७६) वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला वेगात खाली गेली. यावेळी गाडीने पलटी खाल्ली व पन्नास ते साठ फूट गाडी खाली घसरत गेली. यावेळी गाडीच्या पुढील भागातील एअर बॅगा ओपन झाल्या होत्या. पलटी झालेल्या गाडीतील एका तरुणाची मान खिडकीच्या काचेत अडकली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते खंडू चकोर, प्रवीण अशोक कोल्हे व आणखी दोन नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी तरुणांचा जीव वाचवला.
या अपघातात ऋषिकेश यादव (वय ३५) शिरूर,एकनाथ शिंगाल (वय ३३) रा.वाघोली हे जखमी झाले असून शिक्रापूर येथील लंघे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
…अन रुग्णवाहीकेला पाऊणतास उशीर
कोरेगाव भीमा येथील अपघात स्थळी मदतीसाठी गेलेल्या खंडू चकोर यांनी सांगितले की तरुणांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी १०८ नंबरवर कॉल केला होता. त्यावेळी पाऊण तासाने अँब्युलन्स आली याचे कारण अँब्युलन्स वाहकाला विचारले असता गाडीच्या खराब पाठ्यांचे कारण देत यायला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. जर अपघातात जखमी झालेल्यांना वेळेवर मदत मिळणार नसेल व पाऊण तास वाट पाहावी लागणार असेल तर १०८ च्या सेवेविषयी बोलायचं काय ? आणि कोणाच्या भरवश्यावर रुग्णांनी राहायचे असा प्रश्न पडत असून आता १०८ स्वतःची सुविधा वेळेत उपलब्ध करून देणार की रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता…
मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला…
मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच…
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…