शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबूत (ता.शिरुर) येथील ५५ वर्षीय महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज (दि.२६) घडली असुन जांबुतच्या बागवस्ती परिसरात हादुर्दैवी प्रकार घडला आहे. मुक्ताबाई भाऊ खाडे असे या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. यामुळे वनविभागाचा गलथान कारभार समोर आला असुन शिरुर वनविभागाविरुद्ध नागरिकांचा प्रंचड रोष वाढलेला आहे .वनपरिक्षेत्र अधिकारी हे मनमानी कारभार करत असून ठोस उपाययोजना राबवताना दिसुन येत नाही अशी नागरिकांनामध्ये चर्चा आहे.
सदर महिला हि रविवारी (दि.२५) रोजी सायंकाळ पासुन बेपत्ता होती. आसपासच्या परिसरात शोधाशोध करुनही मुक्ताबाई खाडे यांचा शोध लागला नाही. सदर भागात बिबट्याचे मोठे वास्तव्य असून संशय निर्माण झाल्याने कुटुंबीयांनी वनविभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी वनविभागाकडून परिसरातील शेतांमध्ये शोधाशोध केली असता सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आजूबाजूच्या उसाच्या शेतात शोध घेतला असता या महिलेचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे जांबुत आणि परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. शिरुरच्या वनविभागाच्या कार्यालयात ‘वनपरिक्षेत्र आधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा’ अशी म्हणण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आलेली आहे.
शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…