शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबूत (ता.शिरुर) येथील ५५ वर्षीय महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज (दि.२६) घडली असुन जांबुतच्या बागवस्ती परिसरात हादुर्दैवी प्रकार घडला आहे. मुक्ताबाई भाऊ खाडे असे या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. यामुळे वनविभागाचा गलथान कारभार समोर आला असुन शिरुर वनविभागाविरुद्ध नागरिकांचा प्रंचड रोष वाढलेला आहे .वनपरिक्षेत्र अधिकारी हे मनमानी कारभार करत असून ठोस उपाययोजना राबवताना दिसुन येत नाही अशी नागरिकांनामध्ये चर्चा आहे.
सदर महिला हि रविवारी (दि.२५) रोजी सायंकाळ पासुन बेपत्ता होती. आसपासच्या परिसरात शोधाशोध करुनही मुक्ताबाई खाडे यांचा शोध लागला नाही. सदर भागात बिबट्याचे मोठे वास्तव्य असून संशय निर्माण झाल्याने कुटुंबीयांनी वनविभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी वनविभागाकडून परिसरातील शेतांमध्ये शोधाशोध केली असता सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आजूबाजूच्या उसाच्या शेतात शोध घेतला असता या महिलेचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे जांबुत आणि परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. शिरुरच्या वनविभागाच्या कार्यालयात ‘वनपरिक्षेत्र आधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा’ अशी म्हणण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आलेली आहे.
शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…