मुख्य बातम्या

टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्या विरोधात तब्बल नऊ गावांच्या ग्रामस्थांचे लेखी निवेदन

निवासस्थानी न राहणाऱ्या डॉक्टरच्या बदलीची केली मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ‘आरोग्य’ नावालाच शिल्लक राहिले असून हे केंद्र अक्षरशः मृत्यूचं घर बनले आहे. वैद्यकीय अधिकारी नेमलेले असूनही एक अधिकारी सरकारी निवासस्थानात न राहता बाहेर मजेत मौजमजा करतात. सकाळी काही तास ‘हजेरी’ लावतात आणि दुपारी केंद्र सोडून निघून जातात. त्यामुळे १२ गावं आणि ४ उपकेंद्रांतील हजारो रुग्णांना वेळेवर उपचाराऐवजी थेट ‘मृत्यूची वाट’ पाहावी लागत आहे. याविरोधात बेट भागातील टाकळी हाजी, फाकटे, चांडोह, पिंपरखेड, काठापूर, माळवाडी, शरदवाडी, वडनेर, जांबूत, तब्बल नऊ ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी पुणे,जिल्हा परीषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लेखी पत्राद्वारे निवेदन सादर केले आहे.

“सरकारी डॉक्टर अनुपस्थित असल्यामुळे आमच्या पेशंटला खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. वेळ, पैसा आणि जीव तिन्ही धोक्यात घालावे लागतात,” असा थेट संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे.याहून धक्कादायक म्हणजे या आरोग्य केंद्रावर तक्रार वही व हालचाल रजिस्टरच उपलब्ध नाही. जबाबदारी झटकून फक्त पगार घेणारे हे अधिकारी रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप अधिक तीव्र होत आहे. एका डॉक्टरचे वडील मोठे अधिकारी असल्याने “वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव येतो, तसेच त्यांची कुणी बदली करू शकत नाही असे बोलले जात आहे. त्यामुळे वरीष्ठही कारवाई करत नाही” अशी खात्रीलायक माहितीही पुढे आली आहे.“अशा बेजबाबदार डॉक्टरांची बदली तात्काळ झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही आरोग्य केंद्रावरच त्यांना प्रवेश नाकारू. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडू.या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात बारा गावांच्या ग्रामपंचायतींनी एकमुखाने लेखी पत्रे दिली आहेत. “बदली तात्काळ झाली नाही तर दहा दिवसांत उपोषण!” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सरकारी डॉक्टर शिरूरमध्ये थाटात सुखासीन, आणि टाकळी हाजीचे नागरिक मात्र मृत्यूच्या दाराशी हे आम्हाला अजिबात मान्य नाही, असा संतप्त स्वर संपूर्ण पंचक्रोशीमध्ये घुमत आहे. एकुणच आता या प्रकरणी वरीष्ठ अधिकारी अशा कामचोर आधिकाऱ्यांवर दबाव झुगारून काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

1 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

1 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

1 दिवस ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago