आरोग्य

भरपूर कॅल्शियम देणारे ५ शाकाहारी पदार्थ, मुल दूध पित नसतील तर ‘हे’ पदार्थ खाऊ घाला

हाडं बळकट होण्यासाठी मुलांनी दूध प्यायला पाहिजे असं अनेक महिलांचं म्हणणं असतं, पण मुलांना नेमकं दुधाचंच वावडं असतं. काही मुलांना दूध अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते दूध प्यायला टाळाटाळ करतात.

अशावेळी मुलांना कॅल्शियम मिळणार कसं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यांना इतर काही पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ घालू शकता ज्यातून त्यांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळू शकेल. त्यातला पहिला पदार्थ आहे नाचणी. नाचणीच्या पिठाचे इडली, डोसा, पराठे असे वेगवेगळे पदार्थ करून मुलांना खाऊ घाला.

शेवग्यामधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. शेवग्याचं सूप किंवा शेवग्याची भाजी मुलांना द्यायला हवी.

भेंडीची भाजी हा बऱ्याच लहान मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. त्यामुळे मुलांना भेंडीची भाजी भरपूर खाऊ द्या. कारण भेंडीमधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं.

भरपूर कॅल्शियम देणारा आणखी एक पदार्थ आहे तीळ. मुलांना गोड आवडत असेल तर तीळाचे लाडू, चिक्की असं खायला करून द्या. किंवा मग मुलं थोडी मोठी असतील तर तिळाची चटणी द्या.

रताळ्यांमधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. त्यामुळे फक्त उपवासाच्याच दिवशी नाही तर एरवीही तुम्ही रताळे खा आणि मुलांनाही खाऊ घाला. रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए देखील भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मुलांच्या डोळ्यांसाठीही रताळे खाणं चांगलं आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

5 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

5 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

5 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

5 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

5 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

5 तास ago