आरोग्य

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय

कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं कधीही फायद्याचं. याचमुळं अगदी सहजपणे आजाराशी दोन हात करता येतात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य अन्नपदार्थांचं सेवन आणि व्हिटॅमिन-C चा आहारातील समावेश. व्हिटॅमिन-C शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतो. संत्र आणि लिंबू यांव्यरिक्त इतरही अशी फळं आहेत, ज्यांमध्ये व्हिटॅमिन-C चं प्रमाण अधिक आहे.

आंबा: फळांचा राजा आंबा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतो. साधारण मध्यम स्वरुपातील आंबा १२२ मिलीग्राम व्हिटॅमिन-C देतो. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन-ए सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं.

पपई: सर्व ऋतू मध्ये मिळणारं हे फळ. पचनशक्ती सुधारण्यास अतिशय फायद्याचं आहे. या फळात व्हिटॅमिन-C मुबलक प्रमाणात असतं. एका पपईच्या सेवनाने ८८ मिलीग्रॅम पोषक तत्त्व मिळतात.

स्ट्रॉबेरी: व्हिटॅमिन-C चा चांगला स्त्रोत म्हणजे स्ट्रॉबेरी. या फळात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सिडंट असतात. एक कप स्ट्रॉबेरीच्या सेवनातून १०० मिलीग्राम व्हिटॅमिन-C मिळतं.

अननस: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्या सोबतच अननस हाडं मजबूत करण्यासाठीही फायद्याचा ठरतो. यामध्ये अनेक व्हिटॅमिन आहेत. एका अननसाच्या सेवनाने ७९ मिलीग्रॅम व्हिटॅमिन-C मिळतं.

किवी: एका किवी मध्ये जवळपास ८५ मिलीग्रॅम व्हिटॅमिन-C असतं. याशिवाय व्हिटॅमिन के आणि ई यांनी सुद्धा हे फळ परिपूर्ण आहे. आरोग्यासाठी हे फळ अतिशय लाभदायी आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago