बदललेली जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरत आहे. कारण सध्याच्या काळात प्रत्येकाचेच कामाचे स्वरुप बदलले असून शारिरीक मेहनत कमी झाली आहे. बैठे काम वाढले, व्यायामही नियमितपणे केला जात नाही. याचा परिणाम म्हणून बीपी, मधुमेह असे अनेक आजार कमी वयातच मागे लागत आहेत. अनेकांचे कोलेस्टेराॅल, ट्रायग्लिसराईड वाढत असून हृदयविकाराचे प्रमाणही वाढले आहे. कमी वयात हार्ट अटॅक येण्याची कित्येक उदाहरणे आपण आपल्या सभोवती पाहातो. त्यामुळेच हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल तर काही गोष्टी करणं आवश्यक आहे.
हार्ट अटॅकचा धोका कमी करणाऱ्या सवयी
हृदयविकाराचा धोका कमी करून हृदय मजबूत ठेवायचे असेल तर काेणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या टाळल्या पाहिजेत.
1) दिवसाची सुरुवात ब्रेड, बिस्किटे अशा पदार्थांनी करणे पुर्णपणे सोडून द्या. पिझ्झा, बर्गर असे पदार्थ तुमच्या आहारात अजिबात नको. नियमितपणे सकस, पौष्टिक आहार घ्या.
2) तेल, साखर, फॅट्स, जास्त कॅलरी असणारे पदार्थ, तळलेले तेलकट पदार्थ कमीतकमी प्रमाणात खा. त्या तुलनेत मात्र आहारातले प्रोटीन्सचे, हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा. चहाचे प्रमाणही कमी करा.
3) एकदम पोटभर जेवण्यापेक्षा थोडं थोडं करून दिवसातून ३- ४ वेळेला खा. ते पचायला आणि हृदयाच्या आरोग्यासाठी जास्त चांगलं असतं.
4) रोजच्या स्वयंपाकासाठी मोहरीचं तेल अधिक चांगलं असतं असं डाॅक्टर सांगतात. शिवाय कोणतंही तेल वापरत असाल तरी ते कमीतकमी प्रमाणात खा. रिफाईंड तेल खाणं टाळा. तसेच आहारातून गव्हाचे प्रमाणही कमी करा.
5) दिवसातून ३० ते ४० मिनिटे चालण्याचा व्यायाम करणे हृदयासाठी अधिक चांगले ठरते. शरीर जास्तीतजास्त ॲक्टीव्ह ठेवा.
६) जास्त ताण घेऊ नका. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन करा. नियमितपणे व्यायाम केल्यानेही मानसिक शारिरीक ताण कमी होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…