आरोग्य

कोणता आजार असल्यावर जास्त मीठ खाण टाळल पाहिजे

मीठ आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय कोणतंही अन्न टेस्टी लागत नाही. पण मीठ जास्त खाल्लं तरी समस्या होतात आणि कमी खाल्लं तरी सुद्धा. त्यामुळे मीठ योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे. पण असेही काही आजार असतात ज्यात मीठ कमी खावं किंवा पूर्णपणे टाळावं लागतं, कारण जास्त मीठ शरीरावर खूप वाईट परिणाम करू शकते. खाली जाणून घ्या कोणत्या आजारांमध्ये मीठ टाळणे आवश्यक आहे.

हाय ब्लड प्रेशर

मिठामध्ये सोडियम असतं, जे ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब वाढवण्याचं काम करतं. हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांना मीठ कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून रक्तदाब नियंत्रित राहील.

हार्ट डिसीज

हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर किंवा इतर हृदयविकार असलेल्या रुग्णांनी मीठ कमी खावं. जास्त मिठामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

गाऊट समस्या

गाऊटमध्ये सांध्यामध्ये सूज व तीव्र वेदना होतात. जास्त मीठ व सोडियमचं सेवन केल्यास शरीरातील यूरिक अॅसिड वाढतं, ज्यामुळे गाऊटचे त्रास अधिक वाढू शकतात.

किडनीचे आजार

किडनी फेल्युअर किंवा इतर गंभीर किडनी रोगांमध्ये जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाणी आणि सोडियमचं प्रमाण बिघडतं. यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि स्थिती अधिक बिघडू शकते.

शरीरातील सूज

जर पाय, हात किंवा शरीराच्या इतर भागात सूज असेल तर मिठाचं सेवन कमी करणं आवश्यक आहे. जास्त मिठामुळे शरीरात पाणी धरून ठेवलं जातं, ज्यामुळे सूज वाढते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

15 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

15 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

15 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

15 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

17 तास ago