निरोगी राहण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. पहिली म्हणजे आहार आणि दुसरी म्हणजे नियमित व्यायाम. चांगल्या आरोग्याबाबत बोलताना बहुतेक लोक फक्त आहारावर फोकस करतात. काही लोक पोषण मिळणारं अन्न खातात, तर काही जण सप्लिमेंट्स घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की, रोजची थोडीशी सूर्यकिरणं सुद्धा तुम्हाला निरोगी ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात.
सूर्यप्रकाशाचे आश्चर्यकारक फायदे
हृदयाचं आरोग्य सुधारतं
थोडासा UV प्रकाश ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो. त्यामुळे सूर्यप्रकाश हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यात मदत करतो.
मूड सुधारतो
सूर्यप्रकाश फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. सूर्यप्रकाशामुळे सेराटोनिन नावाचा हार्मोन सक्रिय होतो, ज्यामुळे ऊर्जा वाढते आणि मन प्रसन्न राहतं.
झोपेची क्वालिटी सुधारते
चांगली झोप ही निरोगी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. सकाळची सूर्यकिरणं शरीरातील बायोलॉजिकल क्लॉक रीसेट करतात, ज्यामुळे गाढ आणि शांत झोप लागते.
हाडे आणि स्नायू मजबूत होतात
सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन D तयार होतं, जे कॅल्शियम शोषण वाढवते. त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि स्नायूंचं कार्य सुधारतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
रोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवल्याने इम्युनिटी मजबूत होते. त्यामुळे शरीर अनेक आजारांपासून आणि संसर्गांपासून सुरक्षित राहत.
दीर्घायुष्य मिळू शकतं
ज्यांना नियमितपणे सूर्यप्रकाश मिळतो, ते लोक सामान्यतः अधिक निरोगी आणि दीर्घायुषी असतात. सूर्यप्रकाश शरीरातील जैविक प्रक्रिया संतुलित ठेवतो.
काही गोष्टी लक्षात ठेवा
दुपारच्या तीव्र उन्हात जास्त वेळ राहू नका. डोळ्यांची आणि त्वचेची काळजी घ्या. सनस्क्रीन, टोपी किंवा चष्म्याचा वापर करा.
उन्हात बसण्याची योग्य वेळ
हिवाळ्यात सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत उन्हात बसणे सगळ्यात चांगलं असतं. असं केल्याने शरीराला आवश्यक तेवढं व्हिटॅमिन डी मिळतं. मात्र, नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ ही वेळ सगळ्यात फायदेशीर असते. हाडांच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी दुपारी उन्हात बसणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं.
उन्हात किती वेळ बसाव
व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी उन्हात जास्तीत जास्त २० ते ३० मिनिटे इतकाच वेळ बसावं किंवा फिरावं. हार्ड स्कीन असलेल्या लोकांनी यापेक्षा जास्त वेळ उन्हात बसावं. ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उन्हात बसू नये कारण याने त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…