आरोग्य

थंडी आणि गुणकारी गुळाचे फायदे

गुळाच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसांत तर गुळ अधिक गुणकारी मानला जातो. याच्या सेवनाने शरीर उबदार होण्यास, जेवण लवकर पचण्यास, शरीराला आर्यन मिळण्यास मदत होते.

घसा खवखवत असल्यास गुळ अतिशय फायदेशीर आहे. गुळ आणि आलं एकत्र गरम करुन खाल्ल्याने फरक पडू शकतो.

थंडीच्या दिवसांत सांधेदुखीच्या त्रासाची शक्यता अधिक असते. अशा वेळी गुळ या दुखण्यातून काही प्रमाणात आराम देऊ शकतो. आलं आणि गुळ, किंवा हे मिश्रण एकत्र दुधा सोबतही घेता येऊ शकतं. संधीवात असणाऱ्या रुग्णांनी थंडीच्या दिवसांत रोज गुळ खाणं फायदेशीर ठरतं.

जेवणानंतर एक छोटा तुकडा गुळ खाल्ल्याने पचना संबंधी समस्या कमी होण्यास मदत होते. गुळाच्या सेवनाने पोटात गॅस होण्याची समस्याही कमी होते.

मासिक पाळीत महिलांना अनेकदा त्रास होतो. यावेळी होणारा त्रास आणि चिडचिडेपणा गुळ कमी करु शकतो. या दिवसात ३ ते ४ वेळा गुळ खाऊ शकता.

ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी गुळ खाणं फायद्याचं आहे. गुळात सोडियम आणि पोटॅशियम असतं. हे शरीरात अ‍ॅसिडचं प्रमाण कंट्रोल करण्यास मदत करतं. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकतं.

गुळ लिव्हर स्वस्थ ठेवण्यास मदत करतो. गुळ शरीरातील हानिकारक टॉक्सिन बाहेर काढण्यास, शरीरातील रक्तप्रवाह सुरळित करण्यास मदत करतो. लिव्हर संबंधी समस्या असल्यास गुळ रोज खाणं फायद्याचं आहे.

शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास गुळ खाऊन ती दूर केली जाऊ शकते. आर्यनच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढवलं जाऊ शकतं. गुळाला आर्यनचा उत्तम स्त्रोत मानला जातो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

6 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

6 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

6 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

6 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

6 तास ago