आता उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. तसा उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काही कामानिमित्त बाहेर पडतो आणि उन्हाचा सामना करावा लागतो. सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर येत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढते.
नाकातून रक्त येते, भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, उन बाधण्याचे प्रमाण वाढते, अश्या अनेक समस्या निर्माण होतात, या सर्वांवर *सब्जा* उपयुक्त उपाय आहे.
सब्जा, चवीला गोड आहे. आणि शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते. भरपुर प्रथिने असतात, यांत फायबर, ओमेगा, फाँलिक अँसिड, कँलशिअम, मँग्नेशिअम, लोह, व्हिटमिन सि, ए, भरपुर प्रमाणात आहे.
फायदे
(१) सब्जामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सब्जामध्ये कँलरीजचे प्रमाण अधिक असते.
(२) सब्जामध्ये अल्फा लिनिलेनिक अँसिड असते. ते वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. रोज रात्री पाण्यात भिजवून त्यात लिंबु रस व मध मिसळून ठेवा. सकाळी घ्यावे.
(३) त्वचा विकारांसाठी सब्जा लाभार्थी आहे. त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, तजेलदार राहते.
(४) मधूमेहावर गुणकारी आहे. साखर नियंत्रित राहते.
(५) पोट साफ करण्याचे उत्तम औषध आहे. बी पाण्यात भिजवून सकाळी घ्यावे.
(६) मायग्रेन, डिप्रेशन, मानसिक दौर्ब्यल्य, दूर होते, अंगावर येणारी सूज कमी होते.
(७) खोबरेल तेलात जर सब्जा बी चे चूर्ण मिसळून लावले तर, सोरायसिस, एक्जिमा, बरा होतो.
(सोशल मीडियावरुन साभार)
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…