आरोग्य

जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं का? जाणून घ्या…

वेगवेगळ्या फळांचं सेवन करून आरोग्य चांगलं राहतं. फळांचं सेवन केल्याने पोटासंबंधी, त्वचेसंबंधी आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. सोबतच फळांमधील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. या वेगवेगळ्या फायद्यांमुळे लोक भरपूर फळांचं सेवन करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, फळांचं जास्त सेवन करणंही नुकसानकारकही ठरू शकतं. 

फळांमध्ये आढळणारं फ्रुक्टोज लठ्ठपणा, दातांमध्ये इन्फेक्शन आणि पचनासंबंधी समस्यांचं कारण बनू शकतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा निरोगी रहायचं असेल तर केवळ फळं खाण्याऐवजी संपूर्ण संतुलित पौष्टिक आहार घ्यायला हवा. कधीही कोणत्याही डाएट ट्रेन्डला विचार न करता फॉलो करू नये. 

बरेच लोक लवकर वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त फळांचं सेवन करतात. मात्र, असं करण्याचा डॉक्टर किंवा फीटनेस एक्सपर्ट अजिबात सल्ला देत नाहीत. उलट जास्त फळं खाणं आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण फळांमधील फ्रुक्टोजने लठ्ठपणा वाढतो. 

त्यासोबतच प्रमाणापेक्षा जास्त फळं खाल्ल्याने सूज, जुलाब आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. फळांमध्ये फायबर आणि नॅचरल शुगर असते. ज्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. इतकंच नाही तर फळांमध्ये आढळणारं नॅचरल अॅसिड आणि शुगरमुळे दातांच्या समस्याही होतात. तसेच फळांमधील नॅचरल शुगरने ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचाही धोका असतो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

4 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

4 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

18 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 दिवस ago