आरोग्य

जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं का? जाणून घ्या…

वेगवेगळ्या फळांचं सेवन करून आरोग्य चांगलं राहतं. फळांचं सेवन केल्याने पोटासंबंधी, त्वचेसंबंधी आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. सोबतच फळांमधील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. या वेगवेगळ्या फायद्यांमुळे लोक भरपूर फळांचं सेवन करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, फळांचं जास्त सेवन करणंही नुकसानकारकही ठरू शकतं. 

फळांमध्ये आढळणारं फ्रुक्टोज लठ्ठपणा, दातांमध्ये इन्फेक्शन आणि पचनासंबंधी समस्यांचं कारण बनू शकतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा निरोगी रहायचं असेल तर केवळ फळं खाण्याऐवजी संपूर्ण संतुलित पौष्टिक आहार घ्यायला हवा. कधीही कोणत्याही डाएट ट्रेन्डला विचार न करता फॉलो करू नये. 

बरेच लोक लवकर वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त फळांचं सेवन करतात. मात्र, असं करण्याचा डॉक्टर किंवा फीटनेस एक्सपर्ट अजिबात सल्ला देत नाहीत. उलट जास्त फळं खाणं आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण फळांमधील फ्रुक्टोजने लठ्ठपणा वाढतो. 

त्यासोबतच प्रमाणापेक्षा जास्त फळं खाल्ल्याने सूज, जुलाब आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. फळांमध्ये फायबर आणि नॅचरल शुगर असते. ज्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. इतकंच नाही तर फळांमध्ये आढळणारं नॅचरल अॅसिड आणि शुगरमुळे दातांच्या समस्याही होतात. तसेच फळांमधील नॅचरल शुगरने ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचाही धोका असतो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सरदवाडी गावाजवळ भरधाव पेट्रोल-डिझेल टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने…

4 मिनिटे ago

शिरुर; दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान

शिरुर (तेजस फडके): वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा होत…

8 मिनिटे ago

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…

2 तास ago

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

5 तास ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

5 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

5 तास ago