आरोग्य

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ ही जिभेच्या मागच्या बाजूला, वरच्या बाजूने लोंबणारी, वरची बाजू ४-५ मिमी जाडीची व लांबी सुमारे २ सेंमी व खालची बाजू टोकदार अशी साधारणतः त्रिकोणी आकाराची, स्नायूंची बनलेली असते. ज्यावेळी जीभ आत घेऊन ‘आ’ असा आवाज करतो तेव्हा इतर माणसांना ही पडजीभ नीट दिसते. तिच्या लोंबणाऱ्या टोकाला सूज येते. त्यामुळे तिची लांबी वाढते व ती झोपेत श्वसनमार्गात अडथळा निर्माण करते. त्यामुळे प्रत्येक उच्छवासाचे वेळी ती कंप पावते. त्यामुळे होणाऱ्या आवाजाला घोरणे म्हणतात.

आपण ‘घोरतो आहोत’ हे ज्याचे त्याला समजत नाही. पण घरातील इतरांना त्रास होतो, त्यांची झोपमोड होते, तर काहींना भीती वाटते.

अंगठ्याच्या टोकाला थोडी हळदपूड घेऊन, तोंड उघडून, त्यावेळी आंगठा तोंडात ठेवून ती हळदीची पूड पडजिभेला लावावी. हे काम दिवसातून दोन तीन वेळा करावे. हळद जंतुनाशक व सूजनाशक असल्याने हळद लावण्याचा फायदा होतो.

घशातील उष्णता कमी करण्यासाठी आपण घरात बनवतो ते साजूक तूप, मानेला बाहेरून चोळावे. रोज दोनदा. याने घशातील सूज कमी होते.

प्राणायामातील कपालभाती करण्याने अनेक फायदे होतात, त्याने सर्व श्वसनसंस्था निरोगी राहते.

उशी न घेता झोपायची सवय करावी. सुरुवातीला २ इंच जाड उशी असेल तर हळुहळू तिची जाडी दीड इंच, नंतर एक इंच, अर्धा इंच अशी दर ८-१० दिवसांनी कमी कमी करत जावे. म्हणजे त्या त्यावेळी शरीराची सवय बदलत जाते.

शक्यतो कुशीवर झोपावे.

झोपताना नाकात २-२ थेंब देसी गाईचे तूप घालावेत, याला नस्य म्हणतात. यावेळी मान जास्तीत जास्त मागे करून नाक काटकोनात यावे, म्हणजे टाकलेले तुपाचे थेंब नाकामागील पोकळी मध्ये जाईल. त्याचवेळी ४-५ मिनिटे तरी त्याच स्थितीत रहावे, मग स्थिती बदल करावा.

वजन वाढले की घोरण्याची समस्या होते, म्हणून शक्यतो वजन वाढू देऊ नये.

झोपण्यापूर्वी अनेकांना विडी, सिगारेट, दारू पिण्याची सवय असते. याने उष्णता वाढत असल्याने घोरणे थांबवण्यासाठी या व्यसनांपासून दूर राहावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

2 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

9 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

9 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

9 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

10 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

10 तास ago