फळं किवा सलॅड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. यामागील मोठं कारण आहे कच्चे फळं किवा सलॅड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसार देखील कच्च्या भाज्या आणि फळं सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही. यानंतर पाणी पिण्यानंतर ब्लोटिंगची समस्या येते.
म्हणून पाणी पिऊ नये
फळांमध्ये उच्च प्रमाणात शुक्रोज, फ्रूक्टोज आणि यीस्ट असतं. फळं खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पाणी आणि अॅसिडचा घोळ पोटात यीस्टसाठी विस्तार होण्यास मदत मिळते. परिणामस्वरूप पोटात गॅस निर्माण होते आणि पोट फुगू लागतं.
ओव्हरइटिंग टाळा.
फळं अती प्रमाणात खाणे टाळावे. सलॅड आणि फळं खाल्ल्यानंतर पोटाचा त्रास होण्यामागे अयोग्य प्रमाणात सेवन करणे ठरतं.
अतिसाराचा धोका.
फळांमध्ये अधिक प्रमाणात पाणी असतं आणि फळं खाल्ल्यानंतर पाणी पिण्याने अतिसाराचा धोका वाढतो.
चावून खा
फळांचे सेवन करताना पोटात आढळणारे बॅक्टेरिया सामान्यपेक्षा अधिक वेगाने कार्बन डायऑक्साइडचं निर्माण करू लागतात ज्यामुळे पोट जड वाटू लागतं. ज्यामुळे ढेकर येण्याची आणि पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता वाढू लागते. त्यामुळे फळं योग्य प्रमाणात आणि चावून चावून खावे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…
वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…