आरोग्य

हिवाळ्यात ओल खोबर खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. त्यासोबतच यात कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमही भरपूर असतं. हिवाळ्यात जर तुम्ही रोज याचं सेवन केलं तर काय काय फायदे मिळतील.

१) मेंदुसाठी फायदेशीर: ओलं खोबरं खाऊन केवळ शरीरालाच नाही तर मेंदुला देखील अनेक फायदे मिळतात. यात आयर्न आणि व्हिटॅमिन बी६ आढळतं जे मेंदुची काम करण्याची क्षमता वाढवतं. तसेच स्मरणशक्तीही वाढते.

२) शुगरमध्ये फायदेशीर: ओल्या खोबऱ्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी याचा त्यांचा आहारात समावेश करावा.

३) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर: ओल्या खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन्ससोबतच अनेक अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्सही असतात. जे त्वचा आणि केसांना भरपूर पोषण देतात. यात आढळणारं व्हिटॅमिन ई त्वचा उजळवतं. तसेच याच्या सेवनाने केसांचा रखरखीतपणा दूर होते.

४) स्मरणशक्ती वाढते: हिवाळ्यात नियमितपणे ओलं खोबरं खाल्लाने स्मरणशक्ती वाढते. यासाठी खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन रोज खावे. खोबऱ्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात असतं जे तुमचं आरोग्य चांगलं ठेवतं.

५) पोट राहतं साफ: जर तुमचं पोट खराब झालं असेल तर ओल्या खाबऱ्याचा एक मोठा तुकडा रात्री खाऊन झोपा. सकाळी तुमचं पोट साफ होणार. यात फायबर अधिक प्रमाणात असल्याने यामुळे पोट साफ होतं.

६) उलटी होईल दूर: उन्हाळ्यात ओमोटींगची समस्या अनेकांना भेडसावते. वाढतं तापमान आणि घाम यामुळे असे होते. तुम्हाला जर ओमोटींग झाल्यासारखे वाटत असेल तर खोबऱ्याचा एक तुकडा खावा, याने तुम्हाला आराम मिळेल.

७) रोगप्रतिकार शक्ती वाढते: खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होतं. यात अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी फंगल आणि अ‍ॅंटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

11 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

17 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago