आरोग्य

जेवणानंतर तुम्हीसुद्धा ही चूक करता का

हल्ली युरीक ॲसिड, वजन, काेलेस्ट्रॉल वाढलेल्या व्यक्तींची आकडेवारी खूप दिसून येते. अगदी कमी वयातच अनेकांना हा त्रास होतो. यासाठी बदललेली जीवनशैली देखील खूप जबाबदार आहे. पण तरीही आपण रोज ज्या काही चुका वारंवार करतो, त्यामुळेही तब्येतीवर परिणाम होतोच. त्यापैकीच एक चूक म्हणजे जेवणानंतर गटागट पाणी पिणे. बहुतांश लोक ही चूक करतात.

जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा भरपूर पाणी पिता का

जेवण केल्यानंतर आपल्या जठराचं काम सुरू झालेलं असतं. अन्न पचविण्यासाठी मदत करणारे अनेक बॅक्टेरिया, पाचक रस जठरामध्ये तयार होत असतात. अशावेळी जर आपण भरपूर पाणी प्यायलो तर त्या पाण्यामुळे पाचक रस तयार होण्याचं काम थांबतं. पचनक्रिया मंदावते. अन्नपचन व्यवस्थित होत नाही. न पचलेल्या अन्नामुळे मग शरीरात युरीक ॲसिड तयार होतं. शरीरातील बॅड कोलस्ट्रॉलचे प्रमाणही वाढते. अन्नपचन चांगलं झालं नाही तर त्याचा परिणाम साहजिकच शरीरावर अतिरिक्त चरबीचे थर जमा होण्यात दिसून येतो. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच गटागट पाणी पिऊ नये.

जेवल्यानंतर कधी पाणी प्याव

याविषयी तज्ज्ञ असं सांगतात की जेवताना किंवा जेवल्यानंतर खूप पाणी पिऊ नये. तुम्हाला तहान सहन होतच नसेल तर जेवणाच्या मध्ये अगदी घोट घोट पाणी प्या. असं थोडं थोडं पाणी पिणं पचनासाठी मदत करणारं असतं. शिवाय जेवण झाल्यानंतरही एखादा घोटभर पाणी प्या. त्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी थोडं थोडं करून प्या. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेंदूचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश करा

सध्याच्या काळात धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण आदी गोष्टींमुळे लोकांना आरोग्य आणि आहाराकडे पुरेसं लक्ष देता…

2 तास ago

सकाळी मुलांना झोपेतून तुम्ही कसं उठवता, करा या ५ गोष्टी, मुलं हाेतील तल्लख आणि आनंदी

ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आनंदी राहणं आणि पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणं फार महत्वाचे असते. जर तुमचं मुल सकाळी…

2 तास ago

तूर-हरभरा खरेदीला मुदतवाढ; हरभरा खरेदीचे उद्दिष्टही वाढले

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी…

2 तास ago

एमएसएफडीएच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण; उच्च शिक्षण क्षेत्राला डिजिटल बळ

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) च्या नव्या सुधारित…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना संवेदनशील बनविण्यावर भर

मुंबई: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि अध्यापकांना अधिक संवेदनशील व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य…

3 तास ago

‘यूजी 4.0’मुळे अध्यापक बदलत्या शिक्षण व्यवस्थेशी सुसंगत होतील; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत…

3 तास ago