हल्ली युरीक ॲसिड, वजन, काेलेस्ट्रॉल वाढलेल्या व्यक्तींची आकडेवारी खूप दिसून येते. अगदी कमी वयातच अनेकांना हा त्रास होतो. यासाठी बदललेली जीवनशैली देखील खूप जबाबदार आहे. पण तरीही आपण रोज ज्या काही चुका वारंवार करतो, त्यामुळेही तब्येतीवर परिणाम होतोच. त्यापैकीच एक चूक म्हणजे जेवणानंतर गटागट पाणी पिणे. बहुतांश लोक ही चूक करतात.
जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा भरपूर पाणी पिता का
जेवण केल्यानंतर आपल्या जठराचं काम सुरू झालेलं असतं. अन्न पचविण्यासाठी मदत करणारे अनेक बॅक्टेरिया, पाचक रस जठरामध्ये तयार होत असतात. अशावेळी जर आपण भरपूर पाणी प्यायलो तर त्या पाण्यामुळे पाचक रस तयार होण्याचं काम थांबतं. पचनक्रिया मंदावते. अन्नपचन व्यवस्थित होत नाही. न पचलेल्या अन्नामुळे मग शरीरात युरीक ॲसिड तयार होतं. शरीरातील बॅड कोलस्ट्रॉलचे प्रमाणही वाढते. अन्नपचन चांगलं झालं नाही तर त्याचा परिणाम साहजिकच शरीरावर अतिरिक्त चरबीचे थर जमा होण्यात दिसून येतो. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच गटागट पाणी पिऊ नये.
जेवल्यानंतर कधी पाणी प्याव
याविषयी तज्ज्ञ असं सांगतात की जेवताना किंवा जेवल्यानंतर खूप पाणी पिऊ नये. तुम्हाला तहान सहन होतच नसेल तर जेवणाच्या मध्ये अगदी घोट घोट पाणी प्या. असं थोडं थोडं पाणी पिणं पचनासाठी मदत करणारं असतं. शिवाय जेवण झाल्यानंतरही एखादा घोटभर पाणी प्या. त्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी थोडं थोडं करून प्या. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होतात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (अक्षय टेमगिरे): देविदास बाळासाहेब सातकर यांच्या मालकीच्या उभ्या असलेल्या जेसीबी मशीनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड…
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…