आरोग्य

दूध प्यायले तर ॲसिडिटीचा त्रास वाढतो? दुधात घाला ह्या 5 गोष्टी

हाडं होतील मजबूत:- ‘हाडांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. दूध व दूधयुक्त पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हाडं पोलादी होतात. ज्यांना ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोपेनियाचा त्रास आहे. त्यांनी दुधात हळद मिसळून प्यावे. यामुळे हाडांच्या आरोग्याला भरपूर फायदा होईल.

सर्दी – खोकल्यापासून आराम:- हिवाळ्यात सर्दी – खोकल्याचा प्रचंड त्रास होतो. ज्यांची इम्युनिटी कमी असते. त्यांना याचा त्रास होतो. यासाठी आपण दुधासोबत च्यवनप्राश मिक्स करून खाऊ शकता. यामुळे घसादुखी आणि पोटदुखीपासूनही आराम मिळतो. यामुळे पोटाचेही विकार दूर राहतात.

बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर:- जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर, आपण गायीच्या दुधात हरडची पावडर घालून दूध पिऊ शकता. यासाठी हरड किसून किंवा त्याची पावडर कोमट दुधात घाला. रामदेव बाबा यांच्या मते, ‘एका व्यक्तीने ग्लासभर दुधात २-३ ग्राम हरड पुरेसे आहे. यामुळे पोटाचे विकार दूर राहतात.’

कफ काढून टाकण्यासाठी उपाय:- थंडीत छातीत कफ जमा होण्याची समस्या सामान्य आहे. खोकल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावर मात करण्यासाठी गायीच्या दुधात मुलेठी पावडर घालून प्यावे. या उपायाने खूप फरक पडतो. कफचा त्रास दूर होतो.

अॅसिडिटीचा त्रास होईल दूर:- अनेकदा गायीचं दूध प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होतो. यासाठी गायीच्या कोमट दुधात बडीशेप घालून पिऊ शकता. यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होईल. पित्ताचाही त्रास होत असेल तर, आपण दुधात बडीशेप घालून पिऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

5 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

5 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

6 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

6 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

6 तास ago