आरोग्य

जेवणात या डाळीचं वरण खा, भराभर वाढेल व्हिटामीन B-12

शरीराला प्रोटीनप्रमाणेच व्हिटामीनही आवश्यक असते. या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे थकवा येणं, कमकुवतपणा, सूज येणं, स्मरणशक्ती कमी होणं, रक्ताची कमतरता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात भारतीयांच्या आहारात डाळींचे खास महत्व आहे. डाळींना प्रोटीनचे भांडार मानले जाते. ठराविक डाळीचे पाणी प्यायल्यानं २१ दिवसांत व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करता येते.

शरीरातलं व्हिटामीन बी-१२ कमी झाल्यास कोणती लक्षणं दिसतात

१) थकवा, कमकुवतपणा येणं,

२) त्वचा पिवळी पडणं,

३) जीभेत वेदना जाणवणं,

४) हातापायांमध्ये झिणझिण्या येणं,

५) श्वास घ्यायला त्रास होणं,

व्हिटामीन बी-१२ वाढवण्यासाठी कोणती डाळ खावी

ही डाळ आपल्या स्वंयपाकघरातील मूगाची डाळ आहे. जी खाल्ल्यानं व्हिटामीन बी-१२ शरीराला मिळते. न्युट्रिशनिस्ट नमानी अग्रवाल यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी हिरव्या मुगाच्या डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. या डाळीत व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. याचे रोज सेवन केल्यानं व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होते.

मूग डाळीचे फायदे

मूग डाळ प्रोटीनचा आणि व्हिटामीन्सचा चांगला स्त्रोत आहे. या डाळीतील एंटी ऑक्सिडेंट्स शरीरातील फ्री रॅडीकल्सना कमी करतात. ही डाळ फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. मूग डाळीत मिनरल्सही असतात (Ref). हिरवी मूगाची डाळ खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते, फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. या डाळीत साखरेचे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे ब्लड शुगर वाढण्याचा धोका नसतो.

मुगाची डाळ कशी खावी

रात्री झोपण्याच्याआधी १ कप मूग डाळ व्यवस्थित धुवून घ्या. नंतर त्यात १ कप पाणी घालून ठेवा. सकाळी मूग व्यवस्थित भिजले असतील तर रिकाम्या पोटी याचे सेवन करा. डाळ तुम्ही शिजवून तुम्ही भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

2 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago