आरोग्य

जेवणात या डाळीचं वरण खा, भराभर वाढेल व्हिटामीन B-12

शरीराला प्रोटीनप्रमाणेच व्हिटामीनही आवश्यक असते. या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे थकवा येणं, कमकुवतपणा, सूज येणं, स्मरणशक्ती कमी होणं, रक्ताची कमतरता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात भारतीयांच्या आहारात डाळींचे खास महत्व आहे. डाळींना प्रोटीनचे भांडार मानले जाते. ठराविक डाळीचे पाणी प्यायल्यानं २१ दिवसांत व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करता येते.

शरीरातलं व्हिटामीन बी-१२ कमी झाल्यास कोणती लक्षणं दिसतात

१) थकवा, कमकुवतपणा येणं,

२) त्वचा पिवळी पडणं,

३) जीभेत वेदना जाणवणं,

४) हातापायांमध्ये झिणझिण्या येणं,

५) श्वास घ्यायला त्रास होणं,

व्हिटामीन बी-१२ वाढवण्यासाठी कोणती डाळ खावी

ही डाळ आपल्या स्वंयपाकघरातील मूगाची डाळ आहे. जी खाल्ल्यानं व्हिटामीन बी-१२ शरीराला मिळते. न्युट्रिशनिस्ट नमानी अग्रवाल यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी हिरव्या मुगाच्या डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. या डाळीत व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. याचे रोज सेवन केल्यानं व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होते.

मूग डाळीचे फायदे

मूग डाळ प्रोटीनचा आणि व्हिटामीन्सचा चांगला स्त्रोत आहे. या डाळीतील एंटी ऑक्सिडेंट्स शरीरातील फ्री रॅडीकल्सना कमी करतात. ही डाळ फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. मूग डाळीत मिनरल्सही असतात (Ref). हिरवी मूगाची डाळ खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते, फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. या डाळीत साखरेचे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे ब्लड शुगर वाढण्याचा धोका नसतो.

मुगाची डाळ कशी खावी

रात्री झोपण्याच्याआधी १ कप मूग डाळ व्यवस्थित धुवून घ्या. नंतर त्यात १ कप पाणी घालून ठेवा. सकाळी मूग व्यवस्थित भिजले असतील तर रिकाम्या पोटी याचे सेवन करा. डाळ तुम्ही शिजवून तुम्ही भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

9 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

9 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

9 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

9 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

1 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

1 दिवस ago