आरोग्य

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

पाऊस आला की, डासांचं थैमान वाढतं. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. डेंग्यू डासांचं थैमानही वाढतं. डेंग्यूवर वेळीच उपचार केले नाही तर रूग्णाचा जीवही जाऊ शकतो. डेंग्यू झाल्यावर ताप, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना, हाडे आणि जॉईंट्समध्ये वेदना, मळमळ, उलटी, डोळे दुखणे, सूज आणि त्वचेवर लाल चट्टे अशी लक्षणे दिसतात. अशात रूग्णाची खूप काळजी घ्यावी लागते. डेंग्यूची लागण झाल्यावर रूग्णाची काळजी कशी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

डेंग्यू झाल्यावर या गोष्टींची घ्या काळजी

वेळीच ओळखा लक्षण
डेंग्यूची वेळेवर ओळख पटवणं फार गरजेचं आहे. जर कुणाला तापासोबत थंडी वाजत असेल, डोकेदुखी, कमजोरी किंवा थकवा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. योग्य वेळेवर उपचार करून डेंग्यूपासून बचाव केला जाऊ शकतो.

पोषक आहार घ्या
डेंग्यूच्या रूग्णांनी आपल्या आहारावर खूप लक्ष दिलं पाहिजे. संतुलित आहार घ्यावा. ज्यात ताजी फळं, भाज्या, कडधान्य, डाळी, नट्स, बीन्स यांचा समावेश असावा. यादरम्यान बाहेर, तेलकट, मसालेदार काहीच खाऊ नये. सोडा, कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करू नये.

तरल पदार्थ जास्त घ्या
डेंग्यू झाल्यावर रूग्णाला जास्त लिक्विड दिलं पाहिजे. सूप, आल्या-पुदीन्याचा चहा यात फायदेशीर ठरतो. रूग्णाला भरपूर पाणी प्यायला द्यावं. कोमट पाणी द्यायला हवं.

दारू-सिगारेट ओढू नये
डेंग्यू झाल्यावर चुकूनही दारू किंवा सिगारेट ओढू नये. यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. समस्या आणखी गंभीर होऊ शकते.

डासांपासून बचाव
घरातील डासांपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे जसे की, मच्छरदानी, स्प्रे, क्रीम. पूर्ण कपडे घाला. घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. थांबलेलं पाणी लगेच काढा.

(सोशल मीडियावरून साभार; डॉक्टरांचा सल्ला घ्या)

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

11 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

17 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

17 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

17 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

17 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago