बरेच आयुर्वेदिक उपाय आपण करत असतो.असं म्हणतात औषध जेवढं कडू तेवढंच गुणकारी असत. बरेच घरगुती उपाय आपण करत असतो. विविध औषधे आपण वापरतो. मात्र नैसर्गिक उपचार सर्वांत जास्त फायदेशीर ठरतात. मुख्य म्हणजे अशा उपायांचे शक्यतो दुष्परिणाम होत नाहीत. कडुलिंबाचा पाला सगळीकडे उपलब्ध असतो. मात्र तो वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड समृद्ध आहे हे आपल्याला माहिती नसते. कडुलिंबाचा रस कडु असल्याने आपण तो पिण्यासाठी नाक मुरडतो. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? शरीरासाठी कडुलिंबाचा पाला फारच उपयोगी ठरतो. रोगराईसुद्धा पाल्यामुळे शरीरातुन नाक मुरडत निघून जाते.
शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कडुलिंबाची पाने फार फायदेशीर ठरतात. कडुलिंबात अनेक जीवनसत्वे व खनिजे असतात. यकृताचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी कडुलिंब मदत करते. त्याचप्रमाणे या पाल्याची रक्तशुद्धीकरणास मदत होते. सर्दी खोकल्याच्या संसर्गांपासूनदेखील हा पाला शरीराला वाचवतो. कडुलिंबाची पाने कर्करोग होण्याचा धोका कमी करतात. बरेच जण वजन कमी करण्यासाठी देखील या पानांचे सेवन करतात. दातांच्या, हिरड्यांच्या मजबुतीसाठी हा पाला उपयुक्त आहे. कडुलिंबाच्या पाल्यात फॅटी अॅसिड असते.जे केसांच्या मजबुतीसाठी व वाढीसाठी उपयुक्त असते. यात अँटीऑक्सिडंट असतात.रोगप्रतिकारकशक्ति वाढवण्यासाठी ते उपयुक्त असतात. पाल्याचा रस केसांना लाऊन नाहणेसुद्धा फायदेशीर ठरते.
त्याचप्रमाणे पाल्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्त्चचादेखील छान राहते. मुरूम, सुरकुत्या चेहऱ्यावरील डाग कमी होतात. खास करुन रिकाम्या पोटी कडुलिंबाचा पाला सेवन करावा, आतड्यांसाठी ते जास्त फायदेशीर ठरते.रक्तातील साखर वाढणे हे शारीरिकदृष्या एक वाईट लक्षण आहे.ही साखर आटोक्यात ठेवण्यासाठी कडुलिंबाचा पाला गुणकारी ठरतो. या पाल्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पोट साफ होण्यास मदत करते आणि पोट फुगणे थांबवते.या पाल्याचा रस विविध प्रकारे सेवन करता येतो.हळद आणि पाला एकत्र खाल्यास आणखी फायदेशीर ठरते. पाल्याची पेस्ट करुन, पाला पाण्यात उकळवून, त्याचा रस काढून, पाने भाजून, आदी. वेगवेगळ्या प्रकारे पाला सेवन करता येऊ शकतो. मात्र कडुलिंबाची ताजी पाने रिकाम्या पोटी चावून खाणे जास्त फायदेशीर ठरते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…