आरोग्य

रोज किती लिटर पाणी प्यायलं तर किडनीचे आजार होत नाहीत

किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. तसेच शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलन्स, सोडिअम आणि पोटॅशिअम कंट्रोल करण्याचं देखील काम किडनी करतात. इतकंच नाही तर अनेक हार्मोन्स बनवण्यात आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात किडनीची महत्वाची भूमिका असते.

पण आपल्याच काही चुकांमुळे किडनीची ही वेगवेगळी कामं प्रभावित होतात. किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचं ठरतं. पण बरेच लोक असे असतात जे दिवसभर पाणी भरपूर पिण्याकडे गंभीरतेने बघत नाहीत. अशात त्यांच्या किडनीमध्ये बिघाड होतो. जेव्हा किडनीचे फिल्टर योग्यपणे काम करत नाही, तेव्हा शरीरातील इतरही अवयव प्रभावित होतात. अशात किडनी निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी दिवसभरात किती पाणी प्यावं यााबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

एका दिवसात किती पाणी प्याव

डॉक्टर संजीव सक्सेना यांनी अलिकडेच एका वेबसाइटला सांगितलं की, किडनी हेल्दी ठेवण्यासाठी पाण्याचं असं काही प्रमाण ठरलेलं नाहीये. पाण्याचं प्रमाण हे आपल्या कामावर आणि अ‍ॅक्टिव्हिटीवर अवलंबून असतं. शरीर स्वत:हून सांगत की, किती पाणी पिण्याची गरज आहे. शरीरात पाणी कमी झाल्यावर शरीर तहान लागल्याचा संकेत देतं. तरीही एका व्यक्तीनं दिवसभरात कमीत कमी २ लीटर पाणी प्यायला हंव. ७०० ते ८०० मिली लीटर पाणी शरीरासाठी आवश्यक असतं. पाणी किती प्यावं हे आपल्या कामावर, वातावरणावर, वयावर आणि खाण्यावर अवलंबून असतं.

जास्त पाणीही धोक्याचं

आपण अनेकदा पाहिलं असेल की, बऱ्याच लोकांना एकाचवेळी भरपूर पाणी पिण्याची सवय असते. सकाळी झोपेतून उठल्यावर ते १ ते २ लीटर पाणी पितात. ही सवय चुकीची आहे. एकाचवेळी भरपूर पाणी प्यायल्यावर किडनीवर अधिक दबाव पडतो. त्यामुळे पाणी दिवसभर थोडं थोडं पित रहायला हवं. असं केल्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि किडनीवर दबावही पडत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

6 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

8 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

2 तास ago

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…

2 तास ago

एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…

4 तास ago