आरोग्य

रोज किती लिटर पाणी प्यायलं तर किडनीचे आजार होत नाहीत

किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. तसेच शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलन्स, सोडिअम आणि पोटॅशिअम कंट्रोल करण्याचं देखील काम किडनी करतात. इतकंच नाही तर अनेक हार्मोन्स बनवण्यात आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात किडनीची महत्वाची भूमिका असते.

पण आपल्याच काही चुकांमुळे किडनीची ही वेगवेगळी कामं प्रभावित होतात. किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचं ठरतं. पण बरेच लोक असे असतात जे दिवसभर पाणी भरपूर पिण्याकडे गंभीरतेने बघत नाहीत. अशात त्यांच्या किडनीमध्ये बिघाड होतो. जेव्हा किडनीचे फिल्टर योग्यपणे काम करत नाही, तेव्हा शरीरातील इतरही अवयव प्रभावित होतात. अशात किडनी निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी दिवसभरात किती पाणी प्यावं यााबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

एका दिवसात किती पाणी प्याव

डॉक्टर संजीव सक्सेना यांनी अलिकडेच एका वेबसाइटला सांगितलं की, किडनी हेल्दी ठेवण्यासाठी पाण्याचं असं काही प्रमाण ठरलेलं नाहीये. पाण्याचं प्रमाण हे आपल्या कामावर आणि अ‍ॅक्टिव्हिटीवर अवलंबून असतं. शरीर स्वत:हून सांगत की, किती पाणी पिण्याची गरज आहे. शरीरात पाणी कमी झाल्यावर शरीर तहान लागल्याचा संकेत देतं. तरीही एका व्यक्तीनं दिवसभरात कमीत कमी २ लीटर पाणी प्यायला हंव. ७०० ते ८०० मिली लीटर पाणी शरीरासाठी आवश्यक असतं. पाणी किती प्यावं हे आपल्या कामावर, वातावरणावर, वयावर आणि खाण्यावर अवलंबून असतं.

जास्त पाणीही धोक्याचं

आपण अनेकदा पाहिलं असेल की, बऱ्याच लोकांना एकाचवेळी भरपूर पाणी पिण्याची सवय असते. सकाळी झोपेतून उठल्यावर ते १ ते २ लीटर पाणी पितात. ही सवय चुकीची आहे. एकाचवेळी भरपूर पाणी प्यायल्यावर किडनीवर अधिक दबाव पडतो. त्यामुळे पाणी दिवसभर थोडं थोडं पित रहायला हवं. असं केल्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि किडनीवर दबावही पडत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

59 मिनिटे ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

1 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

5 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

5 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

5 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

5 तास ago