आरोग्य

दिवसभरात किती पाणी प्यावे आणि त्याचे फायदे काय

दिवसभरात किती पाणी प्यावे हे वय, वजन, हवामान आणि शारीरिक श्रमांवर अवलंबून असते. सामान्यतः २.५ ते ३.५ लिटर (८-१२ ग्लास) पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

पाणी पिण्याचे फायदे

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते 

युरीन व घामाद्वारे हानिकारक पदार्थ बाहेर टाकते.

हजम प्रक्रिया सुधारते 

अन्न पचण्यास मदत होते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेला तजेलदार आणि हायड्रेटेड ठेवते.

थकवा आणि डोकेदुखी कमी करते

निर्जलीकरणामुळे होणारा थकवा व डोकेदुखी दूर राहते.

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते 

विशेषतः उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करते.

कोणत्या वेळी पाणी पिणे योग्य

सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या

शरीर डिटॉक्स होते.

जेवणाच्या ३० मिनिटे आधी पाणी प्या 

भूक नियंत्रित होते आणि पचन सुधारते.

व्यायामाच्या आधी आणि नंतर पाणी प्या

स्नायू तंदुरुस्त राहतात.

रात्री झोपण्यापूर्वी थोडे पाणी प्या

शरीर हायड्रेट राहते, पण जास्त पाणी पिऊ नका.

किती पाणी पिऊ नये

गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास पाणी विषबाधा होऊ शकते, ज्यामुळे सोडियमची कमतरता होऊ शकते.

एकदम भरपूर पाणी न पिता थोड्या थोड्या प्रमाणात दिवसभर प्यावे.

विशेष बाबी

उन्हाळ्यात आणि जास्त घाम येत असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा.

जर पाणी कमी प्यायल्यास तोंड कोरडे पडणे, युरीन चा रंग गडद होणे, थकवा येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन पडावे.

उन्हातून बाहेरून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

पाणी नेहमी बसून शांतपणे प्यावे आणि ते घोट घोट करून प्यावे. एकदम जास्ती प्रमाणात एका वेळी पाणी घेणे आरोग्याच्या दृष्टीने घातक होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

5 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

5 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

5 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

6 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

7 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

7 तास ago