आरोग्य

दिवसभरात किती पाणी प्यावे आणि त्याचे फायदे काय

दिवसभरात किती पाणी प्यावे हे वय, वजन, हवामान आणि शारीरिक श्रमांवर अवलंबून असते. सामान्यतः २.५ ते ३.५ लिटर (८-१२ ग्लास) पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

पाणी पिण्याचे फायदे

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते 

युरीन व घामाद्वारे हानिकारक पदार्थ बाहेर टाकते.

हजम प्रक्रिया सुधारते 

अन्न पचण्यास मदत होते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेला तजेलदार आणि हायड्रेटेड ठेवते.

थकवा आणि डोकेदुखी कमी करते

निर्जलीकरणामुळे होणारा थकवा व डोकेदुखी दूर राहते.

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते 

विशेषतः उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करते.

कोणत्या वेळी पाणी पिणे योग्य

सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या

शरीर डिटॉक्स होते.

जेवणाच्या ३० मिनिटे आधी पाणी प्या 

भूक नियंत्रित होते आणि पचन सुधारते.

व्यायामाच्या आधी आणि नंतर पाणी प्या

स्नायू तंदुरुस्त राहतात.

रात्री झोपण्यापूर्वी थोडे पाणी प्या

शरीर हायड्रेट राहते, पण जास्त पाणी पिऊ नका.

किती पाणी पिऊ नये

गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास पाणी विषबाधा होऊ शकते, ज्यामुळे सोडियमची कमतरता होऊ शकते.

एकदम भरपूर पाणी न पिता थोड्या थोड्या प्रमाणात दिवसभर प्यावे.

विशेष बाबी

उन्हाळ्यात आणि जास्त घाम येत असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा.

जर पाणी कमी प्यायल्यास तोंड कोरडे पडणे, युरीन चा रंग गडद होणे, थकवा येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन पडावे.

उन्हातून बाहेरून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

पाणी नेहमी बसून शांतपणे प्यावे आणि ते घोट घोट करून प्यावे. एकदम जास्ती प्रमाणात एका वेळी पाणी घेणे आरोग्याच्या दृष्टीने घातक होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

5 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

5 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

5 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

5 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

6 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

6 तास ago