आरोग्य

तुम्हालाही जेवण करताना घाम येत असेल तर, जाणून घ्या कारणे…

उन्हाळ्यात किंवा एखादं मेहनतीचं काम केलं असेल तर घाम येणं सामान्य समजलं जातं. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना जेवण करताना खूप घाम येतो. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत की, असं का होतं?

अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण करताना घाम येणं सामान्य आहे की चिंताजनक. जर तुम्हालाही जेवण करताना घाम येत असेल तर चिंता करू नका. पण काही केसेसमध्ये हा चिंतेचा विषय असू शकतो. चला तर जाणून घेऊ जेवण करताना घाम येण्याची कारणे…

जेवण करताना घाम येण्याची कारणे

पचनक्रिया

जेवण पचवण्याच्या प्रक्रियेत शरीर एनर्जीचा वापर करतं. या स्थितीत शरीराचं तापमान थोडं वाढू शकतं, ज्यामुळेही घाम येतो. इतकंच नाही तर मसालेदार, तिखट किंवा गरम जेवण केल्याने पोटात जास्त गरमी वाढते, ज्यामुळेही घाम येतो. ही शरीराची एक नॅचरल पद्धत आहे, तर तापमान नियंत्रित करण्यास मदत करतं.

हायपरहाइड्रोसिस

ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरातून सामान्यापेक्षा जास्त घाम येतो. हा घाम कधीही येतो. जेवण करतानाही. जास्त घाम आल्याने रोजचं जीवन प्रभावित होतं. या कंडीशनसाठी डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर ठरतं.

मेटाबॉलिज्म

मेटाबॉलिज्मचा दर वाढल्याने घाम येऊ शकतो. काही लोकांमध्ये मेटाबॉलिज्म दर सामान्यपेक्षा जास्त असतो, ज्यामुळे त्यांना इतरांपेक्षा जास्त घाम येतो.

मेडिकल कंडीशन

काही मेडिकल कंडीशन जसे की, थायरॉईड, डायबिटीस आणि हृदयरोगामध्ये जेवण करताना घाम येण्याची शक्यता असते.

तणाव आणि चिंता

तणाव आणि चिंतेमुळे हृदयाची गति आणि ब्लड प्रेशर वाढतं. ज्यामुळे घाम येऊ शकतो. जेवण करताना तणाव घेतल्यानेही तुम्हाला घाम येऊ शकतो.

नर्वस सिस्टम

नर्वस सिस्टम डॅमेज झाल्याने अनेकदा जेवण करताना घाम येऊ शकतो. नर्व डॅमेज झाल्याने मेंदुपर्यंत संकेत पोहोचत नाहीत आणि यामुळे घाम येऊ लागतो.

चिंतेचा विषय कधी

जर जेवण करताना तुम्हाला जास्त घाम येत असेल आणि याने तुमचं रोजचं जीवन प्रभावित होत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना संपर्क केला पाहिजे. कारण काही स्थितींमध्ये ही समस्या गंभीर असू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

13 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

13 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

14 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

18 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

18 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

19 तास ago