आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून.
तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात…
१) दही रात्रीच्या वेळेस मुळीच खाऊ नये.
२) दही गरम करुन खाऊ नये कारण गरम दही हे आयुर्वेद विषवत मानते.
3) अदमुरे दही तर मुळीच खाऊ नये हा पण जर संडासला घट्ट होण्याची सवय अथवा त्रास असेल तेव्हा काही दिवस उपचाराचा भाग म्हणून आपण ह्याचे सेवन करू शकता पण नियमीत नाही.
४) दही हा पदार्थ आपल्या आहारामंध्ये रोज खाऊच नये.
५) दही नुसते कधीच खाऊ नये तर त्यामध्ये सैंधव, खडी साखर असे काही तरी घालून खावे.
६) उन्हाळा, वसंत ऋतू, शरद ऋतुमध्ये दही खायचे नाही कारण ते शरीरास अपाय कारक ठरू शकते तसे पाहता निसर्ग नियमच असा आहे की ह्या ऋतूत दही चांगले विरजत देखील नाही.
७) डोके दुखी, सर्दी, पडसे, त्वचारोग, अम्लपित्त, संडासला आगहोणे, लघवीची जळजळ, रक्तदोष, कोड, अंगावर सूज येणे, रक्तस्राव, पांडूरोग, चक्कर येणे ह्या तक्रारी असल्यास दही खाऊ नये.
८) दही हे मासे, अंडी, मांस, फळे, भाज्या, कडधान्य ह्यात मिसळून कधीच खाऊ नये कारण असे केल्यास शुक्रदोष, डोळ्यांचे विकार, त्वचा रोग, रक्त विकार, अंगावर किंवा आतील अवयवांना सूज येणे, रक्तविकार होऊ शकतात.
(सोशल मीडियावरुन साभार)
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…