आरोग्य

घामामुळे मांड्या घासून रॅश येते, मग हे घरगुती उपाय करा

उन्हाळा सुरू झाल्यावर अनेक त्रास सुरू होतात. सतत घाम येतो. घशाला कोरड पडते. उन्हामुळे चक्कर येते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अति उष्णतेमुळे अस्वस्थ व्हायला होते. शरीर सारखं डिहायड्रेटेड होते. ओठांनाही सारखी कोरड पडते. चेहरा अगदी करपून निघतो. अशा समस्यांवर आपण विविध उपाय करतच असतो. एक त्रास उन्हाळ्यात असाही होतो, ज्यामुळे चालायचेच वांदे होऊन जातात. हा प्रकार म्हणजे मांड्या कचणे. आपण दिवसभर बाहेर असलो की घाम येत राहतो. आलेला घाम जनेंद्रियांजवळ साठतो. तो तसाच साठून राहिल्याने मग मांड्यांजवळ लाल- लाल चट्टे पडतात.

मांडीला पुरळ येते. सतत खाज सुटत राहते. खाजवल्याशिवाय स्वस्थता मिळत नाही आणि खाजवल्यावर त्यातून रक्त यायला लागते. हा त्रास जाड मांड्या असणार्‍या महिलांमध्ये जास्त उद्भवतो. मांड्यांचे घर्षण झाल्याने तेथील त्वचा घासली जाते आणि मग रॅश येतात. काही सोपे व साधे असे उपाय आहेत, जे केल्याने मांड्यांना होणारा हा त्रास टाळता येतो.

१) उन्हाळ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात घाम येतो. तो घाम पुन्हा शरीरामध्ये मुरतो. घरी असताना हा घाम सतत पुसणे किंवा पाण्याने शरीर स्वच्छ करणे शक्य होते. मात्र दिवसभर कामानिमित्त बाहेर असणार्‍यांना हा घाम साफ करता येत नाही. तो तसाच राहतो. जर शरीरापाशी हवा खेळती राहिली तर, घाम त्रासदायक ठरत नाही. त्यामुळे सैल सुटसुटीत असे कपडे वापरायचे. जाड कापड असलेले कपडे वापरायचे नाहीत. पातळ कापडाचेच कपडे वापरा. हवा खेळती राहिली की त्रास होणार नाही.

२) अंघोळ केल्यावर शरीर व्यवस्थित कोरडे करून घ्यावे. मग सर्वच अवयवांना पावडर लावावी. पावडर लावल्याने शरीरवर रॅश उठत नाही.

३) मांडी काचल्यावर मांडीला खोबरेल तेल लावावे. घासून घासून त्वचा कोरडी झाली असते. खोबरेल तेलामुळे मांड्यांना हाव असणारा थंडावा मिळतो. रात्री झोपतानाही मांड्यांना तेल लावायचे. मांड्या मोकळ्या ठेऊन झोपायचे. सकाळपर्यंत रॅश नक्कीच गायब होईल.

४) जर तुम्हाला खुपच घाम येत असेल तर, कामावरून घरी आल्यावर जरा कोमट पाण्याने अंघोळ करा. शरीरातील उष्णताही कमी होईल आणि घामही धुतला जाईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

6 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

11 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

11 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

11 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

11 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

13 तास ago