उन्हाळा सुरू झाल्यावर अनेक त्रास सुरू होतात. सतत घाम येतो. घशाला कोरड पडते. उन्हामुळे चक्कर येते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अति उष्णतेमुळे अस्वस्थ व्हायला होते. शरीर सारखं डिहायड्रेटेड होते. ओठांनाही सारखी कोरड पडते. चेहरा अगदी करपून निघतो. अशा समस्यांवर आपण विविध उपाय करतच असतो. एक त्रास उन्हाळ्यात असाही होतो, ज्यामुळे चालायचेच वांदे होऊन जातात. हा प्रकार म्हणजे मांड्या कचणे. आपण दिवसभर बाहेर असलो की घाम येत राहतो. आलेला घाम जनेंद्रियांजवळ साठतो. तो तसाच साठून राहिल्याने मग मांड्यांजवळ लाल- लाल चट्टे पडतात.
मांडीला पुरळ येते. सतत खाज सुटत राहते. खाजवल्याशिवाय स्वस्थता मिळत नाही आणि खाजवल्यावर त्यातून रक्त यायला लागते. हा त्रास जाड मांड्या असणार्या महिलांमध्ये जास्त उद्भवतो. मांड्यांचे घर्षण झाल्याने तेथील त्वचा घासली जाते आणि मग रॅश येतात. काही सोपे व साधे असे उपाय आहेत, जे केल्याने मांड्यांना होणारा हा त्रास टाळता येतो.
१) उन्हाळ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात घाम येतो. तो घाम पुन्हा शरीरामध्ये मुरतो. घरी असताना हा घाम सतत पुसणे किंवा पाण्याने शरीर स्वच्छ करणे शक्य होते. मात्र दिवसभर कामानिमित्त बाहेर असणार्यांना हा घाम साफ करता येत नाही. तो तसाच राहतो. जर शरीरापाशी हवा खेळती राहिली तर, घाम त्रासदायक ठरत नाही. त्यामुळे सैल सुटसुटीत असे कपडे वापरायचे. जाड कापड असलेले कपडे वापरायचे नाहीत. पातळ कापडाचेच कपडे वापरा. हवा खेळती राहिली की त्रास होणार नाही.
२) अंघोळ केल्यावर शरीर व्यवस्थित कोरडे करून घ्यावे. मग सर्वच अवयवांना पावडर लावावी. पावडर लावल्याने शरीरवर रॅश उठत नाही.
३) मांडी काचल्यावर मांडीला खोबरेल तेल लावावे. घासून घासून त्वचा कोरडी झाली असते. खोबरेल तेलामुळे मांड्यांना हाव असणारा थंडावा मिळतो. रात्री झोपतानाही मांड्यांना तेल लावायचे. मांड्या मोकळ्या ठेऊन झोपायचे. सकाळपर्यंत रॅश नक्कीच गायब होईल.
४) जर तुम्हाला खुपच घाम येत असेल तर, कामावरून घरी आल्यावर जरा कोमट पाण्याने अंघोळ करा. शरीरातील उष्णताही कमी होईल आणि घामही धुतला जाईल.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…
महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…
1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…
झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…
ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…