तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्येही आढळते. त्याचवेळी, त्याचे गुणधर्म वेदांमध्ये देखील सांगितले आहेत. तुळशीच्या बियांना सब्जा बियाणे, फालुदा बियाणे आणि तुकमरिया बियाणे अशा अनेक नावांनी ओळखले जाते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी झाली की तुळशीचा आणि लवंगाचा चहा प्यायला पाहिजे असे अनेकदा वडीलधारी मंडळी सांगतात. त्याचप्रमाणे तुळशीमुळे तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळतो.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल
तुळशीच्या बियांचा वापर करुन पोटाची समस्या देखील दूर होते. कारण ते शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्यास मल पास होणेही सोपे होते. तुळशीच्या बिया नैसर्गिक रेचक म्हणून काम करतात, ज्यामुळे शरीराच्या आतड्याची हालचाल वाढण्यास मदत होते. कोमट दूध आणि पाण्यासोबत तुळशीचे सेवन केल्यास पचनाच्या समस्यांशिवाय पोट फुगणेही कमी होते.
शुगर रुग्णांसाठी मोठे वरदान
तुळशीच्या बियांचे सेवन शुगरच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. कारण त्यात भरपूर फायबर असते. जे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासाठी तुळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवाव्या लागतील. त्यानंतर सकाळी एक ग्लास दुधात या बिया टाकून प्या. यामुळे तुम्हाला इन्सुलिनमध्ये सुधारणा दिसून येईल.
वजन कमी करण्यास मदत
जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर तुळशीच्या बिया तुमचे वजन कमी करू शकतात. तुळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड जास्त असते. जे वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय त्यात अल्फा-लिनोलेनिक अॅसिड कंपाऊंड देखील आहे. त्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…