शिरूर तालुका

पालकांनी रागावल्याच्या कारणावरून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन दिल्या पालकांच्या ताब्यात

शिरूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर शहरामधून दिनांक १६ मे रोजी व दिनांक १७ मे रोजी दोन अल्पवयीन मुली त्यांचे राहते घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदरबाबत शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३३४/२०२५ व ३३९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हे दाखल करून सदरच्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून शिरूर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून मुलींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. सदरच्या दोन्ही अल्पवयीन मुलींकडे कुठलाही मोबाईल नसल्याने व त्यांना कोणी नेले असावे व कशामुळे नेले असावे याबाबत पालकांना देखील माहिती नसल्यामुळे सदरचे गुन्हे उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

परंतु प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पो. स्टे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांचे आधारे सदरच्या दोन्ही मुलींचा शोथ घेऊन दोन्ही मुली दिनांक १८मे रोजी त्यांचे पालकांचे ताब्यात दिल्या आहेत. तसेच निघून गेलेल्या दोन्ही मुलींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे पालकांशी झालेल्या भांडणाचे किरकोळ कारणावरून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याबाबत तपासात सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, संदीप गिल पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक

रमेश चोपडे, पुणे ग्रामीण, उपविभागीय अधिकारी शिरूर विभाग प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी संदेश केंजळे शिरूर पोलीस स्टेशन, शिरूर पो स्टे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार दीपक राऊत, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, सचिन भोई, नीरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील, रवींद्र आव्हाड, अशोक वितारे, महिला पोलीस अंमलदार गोदावरी थंदरे,महिला पोलीस अंमलदार कल्याणी कोडवते यांचे पथकाने केली आहे…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

2 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

2 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

2 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

2 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

2 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

2 तास ago