पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. परंतु या ऋतूमध्ये अनेक आजार देखील उद्भवतात. दूषित पाण्यामुळे अनेक आजार वाढतात. पावसाळ्यात लहान मुले आणि वयोवृद्ध असणारी माणसं लगेच आजारी पडतात. इतकेच नाही तर आपल्याला या काळात चांगल्या आहारासह, स्वच्छ पाणी, हलका व्यायाम करणे देखील महत्त्वाच आहे.
पावसाळ्यात सर्दी-ताप आणि खोकल्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याचे तळे पाहायला मिळतात यामुळे साथीच्या रोगासह मलेरिया आणि डेंगूचा आजार देखील वाढतो. दूषित पाण्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार वाढतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते त्या लोकांना या आजाराचा धोका सर्वाधिक असतो. रोगप्रतिकारशक्ती चांगले असेल तर ती आपल्याला अनेक संसर्गजन्य आजाराशी लढण्यास मदत करते. जर आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर आपण नैसर्गिकरित्या ती वाढवू शकतो. योग्य प्रकारचा आहार घेतला तर रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते. पावसाळ्यात आपला आहार कसा असायला हवा जाणून घेऊया.
1) पावसाळ्यात आपण आहारात हंगामी फळांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे शरीराला योग्य पोषणतत्व मिळेल. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल तर आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेली फळे खा. आहारात सफरचंद, पेर, बेरी, मनुका, पपई, डाळिंब, चेरी, लिची आणि केळी यांसारखी फळे खा.
2) पावसाळ्यात बाजारात अनेक रानभाज्या आणि हिरव्या भाज्या येतात. भाज्या खाण्यापूर्वी त्या नीट स्वच्छ करुन मगच खा. आपल्या ताटात कारले, दुधीभोपळा, काकडी, बिन्स, भेंडी आणि टोमॅटो यांसारख्या भाज्यांचा समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य निरोगी राहिल तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल.
3) स्वयंपाकघरात असणारे मसाले आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यासाठी आहारात आपण लसूण, आले, हळद, वेलची, जायफळ, काळीमिरी आणि दालचिनीसारखे मसाले आहारात असायला हवे. यामध्ये बॅक्टेरियाविरोधी, दाहक-विरोधी, अँटीव्हायरल, अँटीमायक्रोबिल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत.
4) हर्बल टी आपली रोगप्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्य देखील वाढवू शकते. दररोज आले किंवा तुळशीचा हर्बल चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
5) ड्रायफ्रुट्स हे प्रत्येक ऋतूमध्ये खायला हवे. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे पेशी निरोगी ठेवू शकतात. ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.
(सोशल मीडियावरून साभार)
मधमाशीने डंक मारल्यावर विष त्वचेमध्ये प्रवेश करतं आणि त्यामुळे सूज, लालसरपणा, जळजळ आणि दुखणे सुरू…
हा थकवा देखील साध्या किरकोळ प्रमाणापासून ते अगदी बर्न आऊट सिंड्रोमपर्यंत असू शकतो. म्हणजे इतक्या…
मुंबई: महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक, विचारवंत आणि लोकशाही मूल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी…
मुंबई: चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही. प्रेक्षकांनी तिकीट काढलेले नाही. सेन्सॉरची अंतिम प्रक्रिया पूर्ण झालेली…
दुधामध्ये विष कालवणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाईची नागरीकांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे गंभीर…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC परिसरातील कारेगाव हद्दीतील एका कंपनीत उंचावर काम करताना एका…