आरोग्य

पावसाळ्यात वाढते मलेरिया- डेंगूची साथ, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी ५ उपाय करा

पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. परंतु या ऋतूमध्ये अनेक आजार देखील उद्भवतात. दूषित पाण्यामुळे अनेक आजार वाढतात. पावसाळ्यात लहान मुले आणि वयोवृद्ध असणारी माणसं लगेच आजारी पडतात. इतकेच नाही तर आपल्याला या काळात चांगल्या आहारासह, स्वच्छ पाणी, हलका व्यायाम करणे देखील महत्त्वाच आहे.

पावसाळ्यात सर्दी-ताप आणि खोकल्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याचे तळे पाहायला मिळतात यामुळे साथीच्या रोगासह मलेरिया आणि डेंगूचा आजार देखील वाढतो. दूषित पाण्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार वाढतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते त्या लोकांना या आजाराचा धोका सर्वाधिक असतो. रोगप्रतिकारशक्ती चांगले असेल तर ती आपल्याला अनेक संसर्गजन्य आजाराशी लढण्यास मदत करते. जर आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर आपण नैसर्गिकरित्या ती वाढवू शकतो. योग्य प्रकारचा आहार घेतला तर रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते. पावसाळ्यात आपला आहार कसा असायला हवा जाणून घेऊया.

1) पावसाळ्यात आपण आहारात हंगामी फळांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे शरीराला योग्य पोषणतत्व मिळेल. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल तर आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेली फळे खा. आहारात सफरचंद, पेर, बेरी, मनुका, पपई, डाळिंब, चेरी, लिची आणि केळी यांसारखी फळे खा.

2) पावसाळ्यात बाजारात अनेक रानभाज्या आणि हिरव्या भाज्या येतात. भाज्या खाण्यापूर्वी त्या नीट स्वच्छ करुन मगच खा. आपल्या ताटात कारले, दुधीभोपळा, काकडी, बिन्स, भेंडी आणि टोमॅटो यांसारख्या भाज्यांचा समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य निरोगी राहिल तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल.

3) स्वयंपाकघरात असणारे मसाले आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यासाठी आहारात आपण लसूण, आले, हळद, वेलची, जायफळ, काळीमिरी आणि दालचिनीसारखे मसाले आहारात असायला हवे. यामध्ये बॅक्टेरियाविरोधी, दाहक-विरोधी, अँटीव्हायरल, अँटीमायक्रोबिल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत.

4) हर्बल टी आपली रोगप्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्य देखील वाढवू शकते. दररोज आले किंवा तुळशीचा हर्बल चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

5) ड्रायफ्रुट्स हे प्रत्येक ऋतूमध्ये खायला हवे. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे पेशी निरोगी ठेवू शकतात. ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…

9 तास ago

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही?

उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…

9 तास ago

दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…

9 तास ago

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…

9 तास ago

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…

10 तास ago

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…

10 तास ago