आरोग्य

या ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची चुक अजिबात करू नका

आपल्यापैकी बहुतेक जण एकाच वेळी भाज्या खरेदी करतात, जेणेकरून पुन्हा बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. घरी आणलेल्या या भाज्या फ्रेश राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या लवकर खराब होत नाहीत आणि जास्त काळ ताज्या राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवून नंतर खाल्ल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

काही भाज्या अशा आहेत, ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांची चव खराब होते आणि त्यातील पोषक घटक कमी होतात, पण त्या खाल्ल्याने आरोग्याचंही गंभीर नुकसान होऊ शकते. कॅन्सरचा धोका देखील वाढू शकतो असं म्हटलं आहे.

लसूण

लसूण फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्याची चवही खराब होते आणि त्याचे औषधी गुणधर्म कमी होतात. कधीही सोललेली लसूण खरेदी करू नका आणि ती फ्रीजमध्येही ठेवू नका. असं केल्याने, लसूणला लवकर बुरशी लागू शकते, ज्यामुळे कॅन्सर देखील होऊ शकतो.

कांदे

कांदे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील स्टार्च साखरेत बदलतात, ज्यामुळे कांदे जास्त गोड होतात आणि लवकर कुजू लागतात. अर्धा कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवू नका असा सल्ला देण्यात आला आहे. कापलेला असल्यास कांदा वातावरणातील बॅक्टेरिया शोषून घेऊ लागतो, जो खाल्ल्यामुळे नुकसान होऊ शकतं.

बटाटे

बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नका. बटाट्यांना थंड तापमानात (८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी) ठेवल्यास, त्यात असलेले स्टार्च साखरेत बदलतात. जेव्हा असे बटाटे तळले जातात किंवा बेक केले जातात तेव्हा ते एक्रिलामाइड नावाचा हानिकारक पदार्थ बाहेर सोडतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

2 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

2 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

2 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago