असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते, पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी, योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न पोषण देईल. आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला, तर निश्चितच आरोग्य हे उत्तमच राहणार.
१) पोटाचे चार भाग करावेत. त्यातील दोन भाग घन आहारासाठी ठेवावेत, एक भाग जलासाठी ठेवावा आणि उर्वरित भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा, जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो. आहार हा योग्य रीतीने पचला, तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते.
२) सकाळी उठल्या बरोबर अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे. लिंबाचा रस हा थेट पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त, तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो.
३) जेवणाआधी अर्धा तास एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणाच्या मध्ये एखादा घोट पाण्याचा प्यावा. त्यामुळे आहार सुयोग्य रीतीने पचविला जातो.
४) कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये. असं वारंवार केल्यास मळमळणे, छातीत जळजळणे सुरू होते, तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही, कारण दोन्हींच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या असतात.
५) अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये, पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो.
६) दुपारी जेवणानंतर लगेचच झोपू नये, असे वारंवार केल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचन बिघडते.
७) दुपारचे जेवण हे सकाळच्या जेवणापेक्षा कमी असावे, मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे. रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसून येतात.
८) आहार ताजा बनवलेला, फ्रिज मधील थंड नसावा. तसेच फ्रिज मधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते.
९) पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही, म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये. असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांना कारणीभूत ठरू शकते. दोन जेवणांमध्ये चार तासांचे अंतर असावे.
१०) जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे, त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते.
११) रोजच्या आहारात तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे (केवळ फोडणी पुरते नाही). तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते, प्रतिकार शक्ती कायम ठेवते, तसेच ते एक उत्तम रसायन देखील आहे. शक्यतो गाईचे तूप हे उत्तम, मात्र घरी बनवलेले म्हशीचे तूप देखील उत्तम असते.
१२) दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये. जसे फ्रुट कस्टर्ड, शिकरण. असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचा रोग निर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकते.
१३) अतिकोरडे, अतितेलकट, अतिगरम, अतिशीत, अतिस्निग्ध असा आहार नसावा. सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
(सोशल मिडीयावरून साभार)
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…