आरोग्य

योग्य आहार आणि आपले आरोग्य

असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते, पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी, योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न पोषण देईल. आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला, तर निश्चितच आरोग्य हे उत्तमच राहणार.

१) पोटाचे चार भाग करावेत. त्यातील दोन भाग घन आहारासाठी ठेवावेत, एक भाग जलासाठी ठेवावा आणि उर्वरित भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा, जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो. आहार हा योग्य रीतीने पचला, तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते.

२) सकाळी उठल्या बरोबर अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे. लिंबाचा रस हा थेट पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त, तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो.

३) जेवणाआधी अर्धा तास एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणाच्या मध्ये एखादा घोट पाण्याचा प्यावा. त्यामुळे आहार सुयोग्य रीतीने पचविला जातो.

४) कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये. असं वारंवार केल्यास मळमळणे, छातीत जळजळणे सुरू होते, तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही, कारण दोन्हींच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या असतात.

५) अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये, पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो.

६) दुपारी जेवणानंतर लगेचच झोपू नये, असे वारंवार केल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचन बिघडते.

७) दुपारचे जेवण हे सकाळच्या जेवणापेक्षा कमी असावे, मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे. रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसून येतात.

८) आहार ताजा बनवलेला, फ्रिज मधील थंड नसावा. तसेच फ्रिज मधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते.

९) पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही, म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये. असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांना कारणीभूत ठरू शकते. दोन जेवणांमध्ये चार तासांचे अंतर असावे.

१०) जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे, त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते.

११) रोजच्या आहारात तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे (केवळ फोडणी पुरते नाही). तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते, प्रतिकार शक्ती कायम ठेवते, तसेच ते एक उत्तम रसायन देखील आहे. शक्यतो गाईचे तूप हे उत्तम, मात्र घरी बनवलेले म्हशीचे तूप देखील उत्तम असते.

१२) दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये. जसे फ्रुट कस्टर्ड, शिकरण. असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचा रोग निर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकते.

१३) अतिकोरडे, अतितेलकट, अतिगरम, अतिशीत, अतिस्निग्ध असा आहार नसावा. सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

3 तास ago

उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…

9 तास ago

एकनाथ शिंदेंची बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत उद्धव-राज-राहुल गांधींवर टीका

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" असल्याची टीका…

9 तास ago

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार…

9 तास ago

ठाणेच्या वाहतुकीला मोठा दिलासा; २०० कोटींच्या तीन हात नाका प्रकल्पाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…

9 तास ago

६५९ पदांची भरती म्हणजे तरुणांची क्रूर थट्टा’; मिंधे सरकारवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा…

9 तास ago