मुख्य बातम्या

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार

शिरूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील आंबळे परिसरात चासकमान पाटबंधारे विभागाकडून कालव्याच्या पाटाचे सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम कालव्याच्या हेडऐवजी टेलपासून सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांच्या मते, कालव्याच्या हेड भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असताना ती रोखण्याऐवजी टेलपासून अस्तरीकरण सुरू करण्यामागील कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. धरणातून सुमारे ६०० क्युसेस पाणी सोडले जात असले तरी शिरूर तालुक्यात पोहोचेपर्यंत ४०० ते ४२० क्युसेस पाण्याची गळती होत असून शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना केवळ १८० ते २०० क्युसेस पाणी मिळत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हेड भागातील गळती तातडीने थांबवली नाही तर शेतीसाठी आवश्यक पाणी मिळणार नाही. तसेच भूजल पातळी खालावून विहिरी, बोअरवेल आणि पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी आंबळे व परिसरातील ग्रामस्थांनी चासकमान पाटबंधारे विभागाला स्पष्ट इशारा दिला आहे. हेडपासून अस्तरीकरणाचे काम सुरू करण्याचा निर्णय तातडीने घेऊन सध्या सुरू असलेले टेलवरील काम थांबवावे, अन्यथा विभागाविरोधात तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

दरम्यान, या प्रकरणावर चासकमान पाटबंधारे विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.यावेळी युवा नेते मयुरदादा बेंद्रे, पंचायत समिती सदस्य दीपक शेठ कोकडे, तसेच विकास जाधव, पवन बेंद्रे, सुजित बेंद्रे, अभिजीत बेंद्रे, लोकेश बेंद्रे, आशुतोष बेंद्रे, तपन बेंद्रे, किरण बेंद्रे, केतन बेंद्रे आणि वायरमन प्रवीण पुंडे उपस्थित होते.

चासकमान डाव्या कालव्यातुन ६०० क्युसेकचा विसर्ग; खाली पोहचते १८० क्युसेकने पाणी मग ४२० क्युसेक पाणी नक्की जाते कुठे…?

चासकमान धरणग्रस्तांसाठी समाधान शिबिर आयोजित करण्याचे निर्देश

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

शिरुरमध्ये माऊली कटके यांच्याविरोधात नाराजीचा सुर…? सोशल मीडियापासून कार्यकर्त्यांपर्यंत असंतोषाची चर्चा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

24 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

24 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

24 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

24 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

24 तास ago