आरोग्य

बदाम आणि मध एकत्र खाल्ल्यानं काय होतं वाचाल तर रोज खाल

बदामामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात एनर्जी फॅट, फायबर, प्रोटीन, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि आयर्न इतके पोषक तत्व असतात. जे शरीराला भरपूर फायदे देतात. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक रात्री भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खातात. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, बदाम मधासोबत खाल्ले तरी शरीराला अनेक फायदे मिळतात. या फायद्यांबाबत आज जाणून घेणार आहोत.

मधासोबत बदाम खाण्याचे फायदे

मधासोबत बदाम खाल्ल्यानं पचन तंत्र मजबूत राहतं. बदाम आणि मध सोबत खाल्ल्यास केस आणि त्वचेची चमक अधिक वाढते.

बदाम आणि मधाचं मिश्रणानं हाडं मजबूत होतात. कारण मधात व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं. तर बदामात कॅल्शिअम असतं.

बदामामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. हे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. मधातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्वामुळे हृदाय निरोगी राहतं.

बदामातील व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सनं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका कमी होतो.

बदाम आणि मधात फायबर व अ‍ॅंटी-डायबेटिक गुण असतात. ज्यामुळे डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळते.

उन्हाळ्यात बदाम कसे खावेत

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बदाम भिजवून खाणं चांगलं ठरतं. बदाम रात्रभर किंवा काही तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. याने साल काढणंही सोपं होतं. तसेच बदाम भिजवून खाल्ले तर त्यातील पोषक तत्व मिळतात. तसेच भिजवलेले बदाम पचवणं सुद्धा सोपं होतं. कच्चे बदाम खाल तर पचन तंत्रासाठी समस्या होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

4 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

6 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

11 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

11 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

11 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

11 तास ago