चिमुटभर मिठाने खाण्यात चव येते किंवा बिघडते. मीठ खाण्याविषयी अनेक संभ्रम आहेत. तसे पाहिले तर मीठ खाण्यात वाईट असे काही नाही, मात्र चुकीच्या प्रमाणात मीठ खाल्ले तर मात्र गडबड होऊ शकते. योग्य प्रमाणात मीठ खाण्याने चयापचय क्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. मीठामुळे शरीराची आर्द्रताही टिकून राहाते. परंतु हे योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. आपल्या शरीरासाठी मीठाचे प्रमाण कमी किंवा अधिक झाले तर संतुलन बिघडून जाईल. अनेक आजार मागे लागतील. अधिक मीठ खाल्लयाने उच्च रक्तदाब आणि त्वचारोगाला सामोरे जावे लागेल.
निसर्गात मीठाचे किमान 25 प्रकार आहेत. यातील चुना, आयोडीन, गंधक, कॅल्शियम, फॉस्फोरस, क्लोरिन आदी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.
हे सर्व आपल्याला हिरव्या पालेभाज्यांतून मिळतात. त्यामुळे कृत्रिम किंवा बाहेरून कमी मीठ खा. अधिक मीठ, अधिक तहान परिणाम आजार. म्हणून अधिक मीठ खाऊ नका. अधिक मीठामुळ रक्तदाब तर वाढतोच शिवाय अधिक मीठ खाल्ल्याने केसही झडू लागतात. टक्कल पडते.
जास्त मीठ खाल्ल्याने अनिद्रेला सामोरे जावे लागते. कमी मीठ खाल्ल्याने चांगली झोप लागते. अधिक मीठ खाल्ल्याने वातजन्य आजार होतात. म्हणून कमी मीठ खा.
महिलांनी गर्भावस्थेत कमी मीठ खावे. याने अनेक आजार दूर राहातील. अधिक मीठ खाणे म्हणजे लठ्ठपणाला निमंत्रणच. शक्य तेवढे मीठाचा वापर कमी करा.
(सोशल मीडियावरून साभार)
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…
मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…
बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…