आरोग्य

वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम

वाढलेले वजन ही आरोग्यविषयक मोठी समस्या आहे. याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सर्व वयाच्या व्यक्तींनी आपले वजन आटोक्यात ठेवणे कधीही चांगलेच आहे. वाढलेल्या वजनाचे काय काय परिणाम होऊ शकतात, हे आज आपण पाहू.

१) आधुनिक युगातील आजार लठ्ठ व्यक्तीला होण्याची शक्यता जास्त असते. वजन आणि शरीरातील चरबी वाढल्याने रक्तदाब, हृदयविकार, हदयाशी संबंधित समस्या, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक या आजारांचा धोका वाढतो. पोटात चरबी वाढल्याने इन्शुलीनचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. यातून टाईप २ मधुमेह होतो. शरीर आडवेतिडवे वाढले तर सर्व पेशींना रक्त पुरविण्यासाठी हदयाला किती काम करावे लागेल, विचार करा. यातून रक्तदाब, हृदयविकार होतात.

२) लठ्ठ व्यक्तीला खूप घाम येतो. यामुळे त्वचेचे विकार बळावू शकतात. पायांवर व घोट्यांभोवती सूज येते. त्यामुळे हालचाल करण्यास अडथळे निर्माण होतात. पाठ आणि कंबर दुखते.

३) चरबी फक्त त्वचेखाली वाढते असे नव्हे तर ती आतील इंद्रियांभोवतीदेखील वाढू शकते. उदा छाती व पोट यांच्यामधील पडद्यावर चरबी साठली तर फुप्फुसावर दाब पडून श्वसनास अडथळा येतो. थोड्याशा श्रमामुळेही धाप लागते. व्यायाम व हालचाली नको वाटतात. किडनीभोवती चरबी वाढली तर किडनीचे कार्य मंदावते. फॅटी लिव्हर समस्या निर्माण होते.

४) वाढलेल्या वजनाचा भार सांधे व गुडघ्यावर पडतो. वेगाने हालचाल करणे शक्य होत नाही. लठ्ठ व्यक्तीला हमखास गुडघेदुखी होते.

५) लठ्ठ स्त्रियांना गरोदरपणात आणि बाळंतपणात काही समस्या निर्माण होतात. ब्लडप्रेशर अचानक वाढू शकते. बाळाला धोका निर्माण होतो.

६) स्थूलतेमुळे इतरही काही समस्या निर्माण होतात. शारीरिक क्षमता कमी होतात. शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. याचा आनंद घेता येत नाही, मानसिक ताण वाढतो. त्यातून डिप्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.

७) लठ्ठ व्यक्ती खूप घोरतात. याचा इतरांना त्रास होतो. झोपेत अचानक श्वास बंद पडू शकतो. याला स्लीप अपनिया असे म्हणतात. असे एखादा क्षणच होते, लगेच जाग येते. पण ती व्यक्ती घाबरून जाते. असे वारंवार होऊ शकते. यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. सकाळी उठल्यावर कंटाळा येतो.

८) वजन वाढण्याचा मानसिक त्रासही होतो. जाड व्यक्तीला एक प्रकारचा कमीपणा, न्यूनगंड वाटतो. अशी व्यक्ती मग चेष्टेचा विषय बनते. मित्र, नातेवाईक टोमणे मारतात. वजन कमी कसे करावे याचे अनाहूत सल्ले सुरु होतात.

९) जाड व्यक्ती सुंदर असली तरी जाडीमुळे स्वत:ला कुरुप समजते. त्या व्यक्तीचा आत्मविश्वास, आत्मसन्मान कमी होतो. नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. अशी व्यक्ती मग जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

2 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

2 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

3 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

8 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

9 तास ago