आरोग्य

वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम

वाढलेले वजन ही आरोग्यविषयक मोठी समस्या आहे. याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सर्व वयाच्या व्यक्तींनी आपले वजन आटोक्यात ठेवणे कधीही चांगलेच आहे. वाढलेल्या वजनाचे काय काय परिणाम होऊ शकतात, हे आज आपण पाहू.

१) आधुनिक युगातील आजार लठ्ठ व्यक्तीला होण्याची शक्यता जास्त असते. वजन आणि शरीरातील चरबी वाढल्याने रक्तदाब, हृदयविकार, हदयाशी संबंधित समस्या, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक या आजारांचा धोका वाढतो. पोटात चरबी वाढल्याने इन्शुलीनचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. यातून टाईप २ मधुमेह होतो. शरीर आडवेतिडवे वाढले तर सर्व पेशींना रक्त पुरविण्यासाठी हदयाला किती काम करावे लागेल, विचार करा. यातून रक्तदाब, हृदयविकार होतात.

२) लठ्ठ व्यक्तीला खूप घाम येतो. यामुळे त्वचेचे विकार बळावू शकतात. पायांवर व घोट्यांभोवती सूज येते. त्यामुळे हालचाल करण्यास अडथळे निर्माण होतात. पाठ आणि कंबर दुखते.

३) चरबी फक्त त्वचेखाली वाढते असे नव्हे तर ती आतील इंद्रियांभोवतीदेखील वाढू शकते. उदा छाती व पोट यांच्यामधील पडद्यावर चरबी साठली तर फुप्फुसावर दाब पडून श्वसनास अडथळा येतो. थोड्याशा श्रमामुळेही धाप लागते. व्यायाम व हालचाली नको वाटतात. किडनीभोवती चरबी वाढली तर किडनीचे कार्य मंदावते. फॅटी लिव्हर समस्या निर्माण होते.

४) वाढलेल्या वजनाचा भार सांधे व गुडघ्यावर पडतो. वेगाने हालचाल करणे शक्य होत नाही. लठ्ठ व्यक्तीला हमखास गुडघेदुखी होते.

५) लठ्ठ स्त्रियांना गरोदरपणात आणि बाळंतपणात काही समस्या निर्माण होतात. ब्लडप्रेशर अचानक वाढू शकते. बाळाला धोका निर्माण होतो.

६) स्थूलतेमुळे इतरही काही समस्या निर्माण होतात. शारीरिक क्षमता कमी होतात. शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. याचा आनंद घेता येत नाही, मानसिक ताण वाढतो. त्यातून डिप्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.

७) लठ्ठ व्यक्ती खूप घोरतात. याचा इतरांना त्रास होतो. झोपेत अचानक श्वास बंद पडू शकतो. याला स्लीप अपनिया असे म्हणतात. असे एखादा क्षणच होते, लगेच जाग येते. पण ती व्यक्ती घाबरून जाते. असे वारंवार होऊ शकते. यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. सकाळी उठल्यावर कंटाळा येतो.

८) वजन वाढण्याचा मानसिक त्रासही होतो. जाड व्यक्तीला एक प्रकारचा कमीपणा, न्यूनगंड वाटतो. अशी व्यक्ती मग चेष्टेचा विषय बनते. मित्र, नातेवाईक टोमणे मारतात. वजन कमी कसे करावे याचे अनाहूत सल्ले सुरु होतात.

९) जाड व्यक्ती सुंदर असली तरी जाडीमुळे स्वत:ला कुरुप समजते. त्या व्यक्तीचा आत्मविश्वास, आत्मसन्मान कमी होतो. नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. अशी व्यक्ती मग जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

8 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

8 तास ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

8 तास ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

18 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

18 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

18 तास ago