आरोग्य

लिंबू आणि कापराच्या मिश्रणाने दूर होतील या ५ समस्या

दाताचं दुखणं होईल दूर:- लिंबू आणि कापूर एकत्र करून लावल्याने दात दुखण्याची समस्या दूर करता येते. तसेच याने दातांना किडही लागत नाही. यासाठी लिंबाच्या रसात चिमूटभर कापूर टाकून दातांवर लावा. त्यानंतर पाण्याने गुपळा करा.

पोटासंबंधी समस्या:- लिंबू आणि कापराचं मिश्रण लावल्याने पोटासंबंधी समस्या दूर केल्या जाऊ शकतात. याने पोटदुखी, अपचन यांसारख्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात. याचा वापर करण्यासाठी लिंबाच्या रसात कापूर, ओवा आणि पदीन्याचा रस पाण्यात टाकून सेवन करा. याने फायदा मिळेल.

पायांची स्वच्छता:- पायांची टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबू आणि कापराचं मिश्रण फायदेशीर ठरतं. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस आणि कापूर टाकून या पाण्यात काही वेळ पाय टाकून बसा. नंतर साध्या पाण्याने पाय धुवावे. काही वेळ हा उपाय केल्याने पायांवरील टॅनिंग, पायांवरील मळ, माती दूर होईल.

केसगळती थांबेल:- लिंबू आणि कापराचं मिश्रण केसांवर लावल्याने कोंड्याची समस्या दूर करता येते. यात अ‍ॅंटी-डॅंड्रफ आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेलाही इन्फेक्शन होणार नाही. तसेच केसगळतीची समस्याही दूर होईल.

वजन होईल कमी:- शरीराचं वाढलेलं वजन वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस आणि कापराचं वापर करू शकता. याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होईल, ज्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्याचा वेग वाढेल. याचा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

के.ई.एम. रुग्णालय नामांतरावरून वाद; ‘फलक नव्हे, सुविधा वाढवा’ – अमोल मातेले

मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…

43 मिनिटे ago

घराणेशाहीमुळे महिला आरक्षणाला विरोध; नीलम गोऱ्हे यांचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…

49 मिनिटे ago

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…

1 तास ago

पीसीएम-पीसीबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणीसाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…

1 तास ago

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

22 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

22 तास ago