आरोग्य

फक्त ४ थेंब तूप ‘या’ पद्धतीने वापरा, आरोग्याच्या सगळ्या तक्रारी दूर होतील

प्रत्येकाच्याच आरोग्याच्या काही ना काही समस्या सतत चाललेल्या असतात. तब्येतीमध्ये जरा काही खुट्ट झालं की बहुतांश लोकांचा कल लगेचच गोळ्या- औषधी घेण्याकडे असताे. पण असं वारंवार औषधं घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे असे काही उपाय करावेत ज्यामुळे आपली तब्येत तर ठणठणीत राहीलच पण त्याचा अन्य कोणताही दुष्परिणाम तब्येतीवर होणार नाही. असाच एक उपाय योग तज्ज्ञांनी सुचविला आहे. यामध्ये आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुपाचा कशा पद्धतीने वापर करावा…

तुपाचे आरोग्यदायी फायदे..

आपल्या शरीराचे असे चार भाग आहेत जिथे जर तुम्ही नियमितपणे तूप लावून मालिश केली तर त्यामुळे अनेक त्रास कमी होऊ शकतात. ते भाग नेमके कोणते याविषयीची माहिती wellnesswithmanisha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

1) डोळे: हात स्वच्छ धुवून शुद्ध तूप थोडेसे बोटावर घ्यावे आणि काजळ लावल्याप्रमाणे बोट फिरवावे. अशा पद्धतीने डोळ्यात थेंबभर तूप घातल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो. स्क्रिन पाहून हल्ली अनेकांच्या डोळ्यांवर ताण येतो, डोळे कोरडे पडतात. हा त्रास कमी करण्यासाठीही थेंबभर तूप उपयोगी ठरते.

2) नाक: एक थेंब तूप बोटाला लावावे आणि ते नाकाला आतून लावावे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास कमी होतो. तसेच मानसिक ताण कमी होण्यासाठी मदत होते.

3) नाभी: थेंबभर तूप बेंबी म्हणजेच नाभीमध्ये घातल्यास प्रजनन संस्था तसेच पचन संस्थेचे कार्य अधिक चांगले होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच केस आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते.

4) तळपाय: थोडेसे तूप घेऊन रात्री झोपण्यापुर्वी तळपायाला मालिश करावी. यामुळे मन शांत होण्यास मदत होते. मनातले विचार कमी होतात तसेच संपूर्ण शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण…

10 तास ago

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या…

10 तास ago

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न…

10 तास ago

पाण्याचे महत्व

1) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे…

10 तास ago

दातांचे दुखणे वाढले, किचनमधील या वस्तूंचा करा वापर

लवंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी…

10 तास ago

उत्तम आरोग्य म्हणजे काय

जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक,…

10 तास ago