प्रत्येकाच्याच आरोग्याच्या काही ना काही समस्या सतत चाललेल्या असतात. तब्येतीमध्ये जरा काही खुट्ट झालं की बहुतांश लोकांचा कल लगेचच गोळ्या- औषधी घेण्याकडे असताे. पण असं वारंवार औषधं घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे असे काही उपाय करावेत ज्यामुळे आपली तब्येत तर ठणठणीत राहीलच पण त्याचा अन्य कोणताही दुष्परिणाम तब्येतीवर होणार नाही. असाच एक उपाय योग तज्ज्ञांनी सुचविला आहे. यामध्ये आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुपाचा कशा पद्धतीने वापर करावा…
तुपाचे आरोग्यदायी फायदे..
आपल्या शरीराचे असे चार भाग आहेत जिथे जर तुम्ही नियमितपणे तूप लावून मालिश केली तर त्यामुळे अनेक त्रास कमी होऊ शकतात. ते भाग नेमके कोणते याविषयीची माहिती wellnesswithmanisha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
1) डोळे: हात स्वच्छ धुवून शुद्ध तूप थोडेसे बोटावर घ्यावे आणि काजळ लावल्याप्रमाणे बोट फिरवावे. अशा पद्धतीने डोळ्यात थेंबभर तूप घातल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो. स्क्रिन पाहून हल्ली अनेकांच्या डोळ्यांवर ताण येतो, डोळे कोरडे पडतात. हा त्रास कमी करण्यासाठीही थेंबभर तूप उपयोगी ठरते.
2) नाक: एक थेंब तूप बोटाला लावावे आणि ते नाकाला आतून लावावे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास कमी होतो. तसेच मानसिक ताण कमी होण्यासाठी मदत होते.
3) नाभी: थेंबभर तूप बेंबी म्हणजेच नाभीमध्ये घातल्यास प्रजनन संस्था तसेच पचन संस्थेचे कार्य अधिक चांगले होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच केस आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते.
4) तळपाय: थोडेसे तूप घेऊन रात्री झोपण्यापुर्वी तळपायाला मालिश करावी. यामुळे मन शांत होण्यास मदत होते. मनातले विचार कमी होतात तसेच संपूर्ण शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…