महाराष्ट्र

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून, जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री म्हणून १९९१ ते १९९३ या काळात कार्यरत असताना सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना राबवत जलसंधारण, पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागावर आधारित विकास मॉडेल राज्यासमोर मांडले. त्यांच्या कार्यकाळात स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आली तसेच माती नाला बांध, सलग समतल चर, नाला बंडिंग यांसारख्या लघु जलसंधारण कामांना मोठी चालना मिळाली.

मंत्री संजय राठोड यांनी सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि जलसंधारणाबाबत जनजागृती वाढावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

शासन निर्णयानुसार, या दिवशी मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयांमध्ये सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन, मृद व जलसंधारणाची शपथ, जलसंधारण प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण, जलपूजन, श्रमदान, जनजागृती अभियान तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम विभागाच्या उपलब्ध निधीतून राबविण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे स्व. सुधाकरराव नाईक यांचा जलसंधारणाचा विचार नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना अधिक व्यापक स्वरूपात रुजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या…

1 तास ago

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न…

1 तास ago

पाण्याचे महत्व

1) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे…

1 तास ago

दातांचे दुखणे वाढले, किचनमधील या वस्तूंचा करा वापर

लवंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी…

2 तास ago

उत्तम आरोग्य म्हणजे काय

जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक,…

2 तास ago

शिक्रापूरमध्ये अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरून ब्लॅकमेल

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर परिसरात सोशल मीडियावर खोटी ओळख निर्माण करून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या…

3 तास ago