महाराष्ट्र

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून, जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री म्हणून १९९१ ते १९९३ या काळात कार्यरत असताना सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना राबवत जलसंधारण, पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागावर आधारित विकास मॉडेल राज्यासमोर मांडले. त्यांच्या कार्यकाळात स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आली तसेच माती नाला बांध, सलग समतल चर, नाला बंडिंग यांसारख्या लघु जलसंधारण कामांना मोठी चालना मिळाली.

मंत्री संजय राठोड यांनी सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि जलसंधारणाबाबत जनजागृती वाढावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

शासन निर्णयानुसार, या दिवशी मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयांमध्ये सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन, मृद व जलसंधारणाची शपथ, जलसंधारण प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण, जलपूजन, श्रमदान, जनजागृती अभियान तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम विभागाच्या उपलब्ध निधीतून राबविण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे स्व. सुधाकरराव नाईक यांचा जलसंधारणाचा विचार नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना अधिक व्यापक स्वरूपात रुजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कोंडीने उद्योगांना स्थलांतराची भीती; मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोरेगाव भीमा : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर फटका सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव…

31 मिनिटे ago

पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक, त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण

काही पारंपरिक पदार्थ ठराविक सणांना किंवा ठराविक पदार्थांसोबत केले जातात. जसे महाराष्ट्रात फार लोकप्रिय असलेला…

55 मिनिटे ago

स्मरणशक्ती वाढवणारे बेस्ट ५ फूड्स, सोबतच आणखी सुधारेल मेंदुचं काम

शरीराला आपलं काम करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांसोबतच मेंदुला सुद्धा पोषक…

60 मिनिटे ago

थकवा त्या मागची कारणे व उपाय

थकवा हा शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाचा असू शकतो. जर सतत थकवा जाणवत असेल तर त्यामागे…

1 तास ago

MMRDA भरती परीक्षेच्या निकालावर काँग्रेसचा आक्षेप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

मुंबई: भाजपा सरकारच्या काळात परीक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही.…

1 तास ago

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी : मदत कौतुकास्पद, पण निकषांचा पुनर्विचार गरजेचा

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी शेकडो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळते, ही निश्चितच…

1 तास ago