महाराष्ट्र

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या निकालात संपूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही तब्बल २९ विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुनर्तपासणीनंतर हेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने उत्तरपत्रिका तपासणीतील गंभीर निष्काळजीपणा उघड झाला आहे. या प्रकरणावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

“विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासा, त्यांच्या भविष्याची परीक्षा घेऊ नका. शून्य गुण द्यायचेच असतील, तर अशा निष्काळजी आणि ढिसाळ व्यवस्थेलाच द्या,” अशा शब्दांत तांबे यांनी परीक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका केली.

पुनर्तपासणीनंतर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असला, तरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुनर्तपासणीसाठी वेळ, पैसे आणि मानसिक ताकद असतेच असे नाही. त्यामुळे चुकीच्या निकालामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांतील पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, निकालातील त्रुटी आणि आता उत्तरपत्रिका तपासणीतील हलगर्जीपणामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असल्याचे तांबे यांनी म्हटले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व परीक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.

यासोबतच उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेचे स्वतंत्र आणि पारदर्शक ऑडिट करण्यात यावे, तसेच परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा हलगर्जीपणाचा खेळ पुन्हा होणार नाही, यासाठी सक्षम आणि जबाबदार परीक्षा व्यवस्था उभी करावी, अशी मागणीही आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण…

1 तास ago

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न…

1 तास ago

पाण्याचे महत्व

1) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे…

1 तास ago

दातांचे दुखणे वाढले, किचनमधील या वस्तूंचा करा वापर

लवंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी…

2 तास ago

उत्तम आरोग्य म्हणजे काय

जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक,…

2 तास ago

शिक्रापूरमध्ये अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरून ब्लॅकमेल

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर परिसरात सोशल मीडियावर खोटी ओळख निर्माण करून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या…

3 तास ago