महाराष्ट्र

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या निकालात संपूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही तब्बल २९ विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुनर्तपासणीनंतर हेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने उत्तरपत्रिका तपासणीतील गंभीर निष्काळजीपणा उघड झाला आहे. या प्रकरणावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

“विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासा, त्यांच्या भविष्याची परीक्षा घेऊ नका. शून्य गुण द्यायचेच असतील, तर अशा निष्काळजी आणि ढिसाळ व्यवस्थेलाच द्या,” अशा शब्दांत तांबे यांनी परीक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका केली.

पुनर्तपासणीनंतर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असला, तरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुनर्तपासणीसाठी वेळ, पैसे आणि मानसिक ताकद असतेच असे नाही. त्यामुळे चुकीच्या निकालामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांतील पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, निकालातील त्रुटी आणि आता उत्तरपत्रिका तपासणीतील हलगर्जीपणामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असल्याचे तांबे यांनी म्हटले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व परीक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.

यासोबतच उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेचे स्वतंत्र आणि पारदर्शक ऑडिट करण्यात यावे, तसेच परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा हलगर्जीपणाचा खेळ पुन्हा होणार नाही, यासाठी सक्षम आणि जबाबदार परीक्षा व्यवस्था उभी करावी, अशी मागणीही आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक, त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण

काही पारंपरिक पदार्थ ठराविक सणांना किंवा ठराविक पदार्थांसोबत केले जातात. जसे महाराष्ट्रात फार लोकप्रिय असलेला…

18 मिनिटे ago

स्मरणशक्ती वाढवणारे बेस्ट ५ फूड्स, सोबतच आणखी सुधारेल मेंदुचं काम

शरीराला आपलं काम करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांसोबतच मेंदुला सुद्धा पोषक…

23 मिनिटे ago

थकवा त्या मागची कारणे व उपाय

थकवा हा शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाचा असू शकतो. जर सतत थकवा जाणवत असेल तर त्यामागे…

27 मिनिटे ago

MMRDA भरती परीक्षेच्या निकालावर काँग्रेसचा आक्षेप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

मुंबई: भाजपा सरकारच्या काळात परीक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही.…

34 मिनिटे ago

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी : मदत कौतुकास्पद, पण निकषांचा पुनर्विचार गरजेचा

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी शेकडो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळते, ही निश्चितच…

38 मिनिटे ago

काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाची आमदार साजीद खान पठाण यांच्यावर जबाबदारी; १९ ऑगस्टला पदग्रहण

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे आमदार साजीद खान पठाण १९ ऑगस्ट…

43 मिनिटे ago