आरोग्य

डायबिटीस कशामुळे होतो, डायबिटीस होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

मधुमेह आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना मधुमेह आहे. मधुमेह ही एक जागतिक समस्या बनली आहे.

स्वादुपिंड हा इंसुलिन सोडून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे, मधुमेहाचा धोका वाढतो. या पेशी अंतःस्रावी पेशी आहेत, जे इंसुलिन हार्मोन तयार करतात. वाढत्या वयानुसार, या पेशी नष्ट होऊ लागतात, ज्यामुळे वृद्धत्वात मधुमेह होऊ शकतो.

अभ्यासात वय आणि लिंगाच्या आधारे मधुमेह होण्याचा धोका किती असतो याबाबत निरीक्षण करण्यात आले. यामध्ये असे समोर आले की, या पेशींची हानी महिलांमध्ये अधिक होते. या पेशींचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्यामुळे मधुमेह होण्यापासून बचाव होऊ शकतो. आता मधुमेह अशी समस्या झाली आहे त्याला वयाची मर्यादा राहिलेली नाही म्हणजे कोणत्याही वयामध्ये कोणालाही डायबिटीस होऊ शकतो.

व्यायाम करा

व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते. यामुळे आपली चयापचय क्रिया देखील चांगली राहते. व्यायामामुळे आपल्या पेशींची इन्सुलिन संवेदनशीलता देखील वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यात ही व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. दररोज ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे.

वजन कमी

जास्त वजन हे मधुमेहाचे एक प्रमुख घटक आहे. तुमचे वजन जास्त असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासाठी आहाराचे नियोजन करू शकता. यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे वजनही कमी होईल.

जेवनावर नियंत्रण ठेवा

जेवताना अनेक वेळा आपण एकाच वेळी खूप जेवतो. नंतर बराच वेळ काहीही खात नाही. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. त्यामुळे मधुमेहाचा धोका असतो. एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, थोड्या अंतराने थोडे जेवण घ्या. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यां, सलाड यांचा वापर जरूर करा. ज्वारीच्या भाकरीचा वापर करा, तांदूळ आणि गहू यांचा शक्यतो वापर टाळावा.साखर आणि मैद्याचे पदार्थ टाळा. नैसर्गिक पद्धतीचे अन्न खाण्यास प्रयत्न करा.

धूम्रपान करू नका

धूम्रपानामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्या शरीरातील पेशी इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाहीत आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहात नाही. ताण तणाव व्यवस्थापन जर योग्य असेल तर नक्कीच डायबिटीस पासून तुम्ही दूर राहू शकता. झोपेच्या वेळा पाळा. पुरेशी विश्रांती घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार सचिन कल्याणशेट्टींना गोळ्या घालण्याची ऑफर? चालकाला दाखवले पैशांचे आमिष

सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे…

2 तास ago

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा ₹1500 हप्ता कधी मिळणार?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या…

2 तास ago

ड्रग्सच्या शोधात पोलिसांचा छापा; २० पोत्यांत तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा सापडला!

पुणे : काकडेवस्ती परिसरात खासगी ट्रॅव्हल्समधून अमली पदार्थांचा साठा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या…

2 तास ago

‘१९ गुन्हे दाखल असलेला माणूस मंत्री कसा?’; सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरेंवर घणाघात

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर…

3 तास ago

अनिशा माजगावकर पुन्हा मनसेत सक्रिय होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर भांडूपच्या राजकारणात खळबळ

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि भांडूपमधील मनसेच्या बंडखोर नेत्या अनिशा माजगावकर यांची आज…

3 तास ago

चाकण MIDCला मोठा धक्का? 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत

चाकण : मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, स्कोडा, ह्युंदाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे स्थान निर्माण…

3 तास ago