आरोग्य

डायबिटीस कशामुळे होतो, डायबिटीस होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

मधुमेह आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना मधुमेह आहे. मधुमेह ही एक जागतिक समस्या बनली आहे.

स्वादुपिंड हा इंसुलिन सोडून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे, मधुमेहाचा धोका वाढतो. या पेशी अंतःस्रावी पेशी आहेत, जे इंसुलिन हार्मोन तयार करतात. वाढत्या वयानुसार, या पेशी नष्ट होऊ लागतात, ज्यामुळे वृद्धत्वात मधुमेह होऊ शकतो.

अभ्यासात वय आणि लिंगाच्या आधारे मधुमेह होण्याचा धोका किती असतो याबाबत निरीक्षण करण्यात आले. यामध्ये असे समोर आले की, या पेशींची हानी महिलांमध्ये अधिक होते. या पेशींचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्यामुळे मधुमेह होण्यापासून बचाव होऊ शकतो. आता मधुमेह अशी समस्या झाली आहे त्याला वयाची मर्यादा राहिलेली नाही म्हणजे कोणत्याही वयामध्ये कोणालाही डायबिटीस होऊ शकतो.

व्यायाम करा

व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते. यामुळे आपली चयापचय क्रिया देखील चांगली राहते. व्यायामामुळे आपल्या पेशींची इन्सुलिन संवेदनशीलता देखील वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यात ही व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. दररोज ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे.

वजन कमी

जास्त वजन हे मधुमेहाचे एक प्रमुख घटक आहे. तुमचे वजन जास्त असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासाठी आहाराचे नियोजन करू शकता. यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे वजनही कमी होईल.

जेवनावर नियंत्रण ठेवा

जेवताना अनेक वेळा आपण एकाच वेळी खूप जेवतो. नंतर बराच वेळ काहीही खात नाही. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. त्यामुळे मधुमेहाचा धोका असतो. एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, थोड्या अंतराने थोडे जेवण घ्या. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यां, सलाड यांचा वापर जरूर करा. ज्वारीच्या भाकरीचा वापर करा, तांदूळ आणि गहू यांचा शक्यतो वापर टाळावा.साखर आणि मैद्याचे पदार्थ टाळा. नैसर्गिक पद्धतीचे अन्न खाण्यास प्रयत्न करा.

धूम्रपान करू नका

धूम्रपानामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्या शरीरातील पेशी इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाहीत आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहात नाही. ताण तणाव व्यवस्थापन जर योग्य असेल तर नक्कीच डायबिटीस पासून तुम्ही दूर राहू शकता. झोपेच्या वेळा पाळा. पुरेशी विश्रांती घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

10 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

15 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

15 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

15 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

15 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

17 तास ago