वेगवेगळ्या ड्राय फ्रूट्सचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. बदाम, काजू, अक्रोड यासोबतच खजूरही खूप महत्वाचं आहे. खजूर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदनुसार खजूर थंड असतं आणि पित्ताची समस्या दूर करण्यासाठी याने खूप फायदा मिळतो. सोबत शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. पण ते खाण्याची योग्य पद्धती अनेकांना माहीत नसते.
खजूरामध्ये फयबर, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअम भरपूर असतात. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक तत्व असतात. यात अॅंटी-ऑक्सिडेंटही असतात. त्याशिवाय यात पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम सारखे पोषक तत्व असतात.
आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, जर तुम्हाला खजूराकडून जास्त फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही ते भिजवून खाल्ले पाहिजे.
भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे
बद्धकोष्ठता दूर होते, हृदयासाठी चांगले, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत, हाडे मजबूत होतात, ब्लड प्रेशर कंट्रोल, पुरूष आणि महिलांची लैंगिक क्षमता वाढवतात, मेंदुसाठी फायदेशीर, कमजोरी दूर होते, रक्ताची कमतरता दूर होते, सूज कमी करतात, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर.
रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे फायदे
1) वजन होईल कमी
सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने तुमचं वाढलेलं वजन कमी होतं. अशात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी झोपेतून उठल्यावर खजूर खावे. याने बराच वेळ पोट भरलेलं राहतं. अशात तुम्ही अनावश्यक खाणं टाळू शकता.
2) वाढेल एनर्जी
जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल तर शरीरात दिवसभर एनर्जी कायम राहते. यात आयरन भरपूर असतं. ज्यामुळे शरीरात हीमोग्लोबिनची लेव्हल वाढते. तसेच तुमच्या भरपूर एनर्जी राहते.
3) डायजेशन होईल मजबूत
ज्या लोकांना नेहमीच पोटात गडबड असते, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खावे. यातील फायबरमुळे डायजेशन आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सोपी होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.
एका दिवसात किती खजूर खावेत
डॉक्टरांनी सांगितलं की, सगळ्या वयातील लोकांनी दिवसातून 2 खजूर खाण्यास सुरूवात करावी. वजन वाढवणाऱ्यांनी रोज 4 खजूर खावेत.
खजूर भिजवून का खावेत
भिजवल्याने खजूरातील टॅनिन आणि फायटिक अॅसिड निघून जातं. ज्यामुळे पोषक तत्व सहजपणे अवशोषित करण्यास मदत मिळते. भिजवलेले खजूर लवकर पचतात. जर तुम्हाला खजूराचे जास्त फायदे हवे असतील तर ते रात्री 8 ते 10 तास भिजवून ठेवा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…