आरोग्य

एक आठवडा नियमित खजूर खाल्ल्याने काय होत, वाचाल तर रोज खाल

वेगवेगळ्या ड्राय फ्रूट्सचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. बदाम, काजू, अक्रोड यासोबतच खजूरही खूप महत्वाचं आहे. खजूर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदनुसार खजूर थंड असतं आणि पित्ताची समस्या दूर करण्यासाठी याने खूप फायदा मिळतो. सोबत शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. पण ते खाण्याची योग्य पद्धती अनेकांना माहीत नसते.

खजूरामध्ये फयबर, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअम भरपूर असतात. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक तत्व असतात. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात. त्याशिवाय यात पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम सारखे पोषक तत्व असतात.

आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, जर तुम्हाला खजूराकडून जास्त फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही ते भिजवून खाल्ले पाहिजे.

भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे

बद्धकोष्ठता दूर होते, हृदयासाठी चांगले, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत, हाडे मजबूत होतात, ब्लड प्रेशर कंट्रोल, पुरूष आणि महिलांची लैंगिक क्षमता वाढवतात, मेंदुसाठी फायदेशीर, कमजोरी दूर होते, रक्ताची कमतरता दूर होते, सूज कमी करतात, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर.

रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे फायदे

1) वजन होईल कमी

सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने तुमचं वाढलेलं वजन कमी होतं. अशात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी झोपेतून उठल्यावर खजूर खावे. याने बराच वेळ पोट भरलेलं राहतं. अशात तुम्ही अनावश्यक खाणं टाळू शकता.

2) वाढेल एनर्जी

जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल तर शरीरात दिवसभर एनर्जी कायम राहते. यात आयरन भरपूर असतं. ज्यामुळे शरीरात हीमोग्लोबिनची लेव्हल वाढते. तसेच तुमच्या भरपूर एनर्जी राहते.

3) डायजेशन होईल मजबूत

ज्या लोकांना नेहमीच पोटात गडबड असते, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खावे. यातील फायबरमुळे डायजेशन आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सोपी होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.

एका दिवसात किती खजूर खावेत

डॉक्टरांनी सांगितलं की, सगळ्या वयातील लोकांनी दिवसातून 2 खजूर खाण्यास सुरूवात करावी. वजन वाढवणाऱ्यांनी रोज 4 खजूर खावेत.

खजूर भिजवून का खावेत

भिजवल्याने खजूरातील टॅनिन आणि फायटिक अॅसिड निघून जातं. ज्यामुळे पोषक तत्व सहजपणे अवशोषित करण्यास मदत मिळते. भिजवलेले खजूर लवकर पचतात. जर तुम्हाला खजूराचे जास्त फायदे हवे असतील तर ते रात्री 8 ते 10 तास भिजवून ठेवा.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

7 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

14 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago