आरोग्य

सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत खाण्याची योग्य वेळ कोणती

1) सकाळचा नाश्ता (सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत) हलका आणि पौष्टिक आहार घ्या.

सकाळी पचनक्रिया मंद असते, म्हणून नाश्ता हलका आणि पोषक तत्वांनी समृद्ध असा असावा. त्यात ताजी फळे, सुकामेवा, दलिया किंवा तूप घालून बनवलेले हलके पदार्थ यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. खूप जड, तळलेले किंवा फ्रिजमधील थंड पदार्थ खाणे टाळावे.

2) दुपारचे जेवण (दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत) थोडा जड आहार घ्यावा.

दुपारच्यावेळी पचनशक्ती सर्वात जास्त चांगली असते, ज्यामुळे शरीर पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेतात. यासाठीच तुमच्या दुपारच्या जेवणात डाळ, भात, रोटी, भाज्या आणि देशी तूप असा संतुलित आहार घ्या. प्रक्रिया केलेले अन्न आणि जास्त तळलेले पदार्थ टाळा.

3) संध्याकाळचा नाश्ता (सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत) – हलका नाश्ता.

संध्याकाळी हलका नाश्ता खाल्ल्याने रात्रीच्या जेवणापूर्वी जास्त भूक लागत नाही आणि पचन सुधारते. यावेळी फळे, भाजलेले मखाणे, सुकामेवा किंवा हर्बल टी घेणे फायदेशीर ठरते. शक्यतो पॅकेजिंग केलेले स्नॅक्स, खूप गोड किंवा तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

4) रात्रीचे जेवण (सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत) हलके अन्नपदार्थ खा.

रात्रीच्या वेळी पचनसंस्था मंदावते, त्यामुळे रात्री उशिरा जड जेवण केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. रात्रीच्या जेवणात डाळ, हलक्या भाज्या, खिचडी किंवा सूप असे अन्नपदार्थ खावेत. जास्त मसालेदार, पचायला जड आणि फ्रिजमधील थंड अन्नपदार्थ खाऊ नयेत.

5) झोपण्यापूर्वी (रात्री ९ ते १० वाजेपर्यंत) तुम्ही काहीतरी हलके पिऊ शकता.

झोपण्यापूर्वी जर तुम्हाला थोडी भूक लागली असेल तर कोमट हळदीचे दूध, हर्बल टी किंवा कोमट पाणी पिणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! वरुडे येथील आरोपीचे स्टेटस; लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…

2 तास ago

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…

5 तास ago

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…

8 तास ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago