महाराष्ट्र

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला असला तरी दक्षिण भारतातील जनतेने भाजपाचा विभाजनवादी विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नाकारले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, पश्चिम बंगाल मध्ये मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या मदतीने नियम व परंपरांचे उल्लंघन केले. एनआयए, सीआरपीएफ तसेच एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दडपशाहीचे वातावरण निर्माण करण्यात आले. तरीही भाजपाने गैरप्रकारांच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला, असा आरोप त्यांनी केला.

मात्र दक्षिण भारतात भाजपाची ही रणनीती निष्फळ ठरली. विशेषतः केरळ मध्ये काँग्रेसचा विजय हा लोकशाही व संविधानाचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसचा विचार आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेने विश्वास दाखवला असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.देशाला काँग्रेसचा विचारच तारू शकतो, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी म्हटले की, केरळमधील विजयामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून हीच ऊर्जा आगामी काळात पक्षाला बळ देईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

7 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

8 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

8 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

12 तास ago

पश्चिम बंगाल, आसाम निकालांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…

12 तास ago